शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंड केल्यास भाजपतून सुटी

By admin | Updated: August 16, 2015 23:57 IST

चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर : तिकीट मिळेल तो निवडणूक लढवेल, मात्र ज्याला तिकीट मिळणार नाही, त्याने देशातील सर्वांत मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून भाजपसाठी कार्यरत राहावे. प्रामाणिकपणे आणि शिस्तीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केले जाईल. मात्र, पक्षाविरोधात बंड करणाऱ्याची पक्षातूनच सुटी दिली जाईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या पूर्वतयारी मेळाव्यात ते बोलत होते. येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनातील मेळाव्यास भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा संघटनमंत्री व ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, रामभाऊ चव्हाण, प्रताप कोंडेकर, विश्वविजय खानविलकर प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजप-ताराराणी आघाडीकडून महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वांना तिकीट देणे शक्य नाही. ज्याला तिकीट मिळणार नाही, त्याने प्रामाणिकपणे, शिस्तीत पक्षासाठी काम करावे. अशा कार्यकर्त्यांना पक्षाकडून काही तरी दिलेच जाईल; केंद्राच्या ‘अमृत’ योजनेत कोल्हापूरचा सहभाग झाला आहे. ‘हृदय’ आणि स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे, महिला व वृद्धांची सुरक्षितता, अंडरग्राऊंड गटर्स, स्वच्छ पाणी, पंचगंगा नदी घाट, रंकाळा शुद्धिकरण, विमान सेवा, आदींच्या पूर्ततेद्वारे शहराचा विकास हे आपले ध्येय आहे. ते साधण्यासाठी महानगरपालिकेवर भाजप-ताराराणीचा झेंडा फडकविण्यासाठी झटावे. महानगर जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणे आवश्यक आहे. भाजप-ताराराणी आघाडीचे ६० हून अधिक उमेदवार निवडून येतील. आघाडी अभेद्य आहे. मेळाव्यास माणिक पाटील-चुयेकर, माजी महापौर नंदकुमार वळंजू, अ‍ॅड. संपतराव पवार, नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, नगरसेविका प्रभाताई टिपुगडे, नीलेश पटेल, विजय जाधव, अशोक देसाई, आदी उपस्थित होते. राहुल चिकोडे यांनी सूत्रसंचालन केले. ऊठसूठ पत्रक काढू नका... राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर भाजप-सेनेची युती कायम राहावी म्हणून मी केलेले प्रयत्न सर्वांना माहीत आहेत; पण काहींना त्यांची जाणीव नसल्याने ते काहीही बोलत आहेत, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लगाविला. शिवाय त्यांच्याकडून होणाऱ्या टीका-आरोपांना उत्तरे देण्यास मी सक्षम आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने ऊठसूठ पत्रक काढू नये, असा सल्लादेखील मंत्री पाटील यांनी दिला. ते म्हणाले, प्रामाणिकपणे कार्यरत रहिल्यास पक्षाकडून दखल घेतली जाते. त्याचे उत्तम उदाहरण मी आहे. स्वत:पेक्षा पक्ष आणि पक्षाहून देश मोठा समजून कार्यरत राहा. इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यातील काही इच्छुक आपल्याकडे पालकमंत्री आणि कोअर कमिटी यांचे लक्ष वेधले जावे, याकरिता हलगी, झांज वाजवत नागाळा पार्कातील जयलक्ष्मी हॉलमध्ये प्रवेश करत होते. ‘रिपाइं’ (ए)ने केली ११ प्रभागांची मागणी कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)ने भाजप-ताराराणी आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाला ११ प्रभाग मिळावेत, अशी मागणी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे व जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे. ओबीसींसाठी ४, अनुसूचित जातीसाठी ५ व सर्वसाधारण १, अशा जागांवर त्यांनी दावा केला आहे. यामध्ये कदमवाडी, टेंबलाईवाडी, संभाजीनगर, कळंबा फिल्टर हाऊस, फुलेवाडी रिंग रोड, क्रांतिसिंह नाना पाटील नगर (कणेरकर नगर), क्रांतिसिंह नाना पाटील नगर (जीवबा नाना जाधव पार्क), राजेंद्रनगर, सिद्धार्थनगर, सदर बाजार, सुधाकर जोशी नगर या प्रभागांची मागणी करण्यात आली आहे. ‘रिपाइं’ला सन्मानाची वागणूक देऊन जागा सोडाव्यात, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.