शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST

लहान पूल वाहतुकीसाठी बंद सततच्या पावसाने पातळीत वाढ सुरूच लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात गेल्या चार ...

लहान पूल वाहतुकीसाठी बंद

सततच्या पावसाने पातळीत वाढ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहर व परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बुधवारी पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ५७ फुटांवर गेली आहे. त्यामुळे लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

शहर व परिसरात मागील काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी, कोयना, चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी (दि.२०) सायंकाळी सहा वाजता पाणीपातळी ५६.६ फुटांवर पोहोचली होती. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने ५७ फुटांवर पोहोचली. पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठावरील भागात पाणी पसरू लागल्याने पुराची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फुटांवर, तर धोका पातळी ७१ फुटांवर आहे. हवामान खात्याने मंगळवारपासून पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्टचा इशारा दिला आहे. नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

फोटो ओळी

२१०७२०२१-आयसीएच-०४

पावसाचा जोर वाढल्याने पाणी लहान पुलाला घासत आहे.

२१०७२०२१-आयसीएच-०५

लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

(सर्व छाया-उत्तम पाटील)