शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

कोल्हापूर : ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ या बाबतीत कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये. कायदा पाळणाऱ्या मालवाहतूकदारांना द्यावे, ...

कोल्हापूर : ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ या बाबतीत कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये. कायदा पाळणाऱ्या मालवाहतूकदारांना द्यावे, अशी मागणी बुधवारी कोल्हापूर जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली. अशाच पद्धतीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनाही दिले.

‘ज्याचा माल त्याचा हमाल’ व ‘ज्याचा माल त्याचा विमा’ याबाबत गेल्या दोन वर्षांपासून असोसिएशन आंदोलन करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधितांची बैठक घेतली होती. यात कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार आयुक्तांना दिले होते. परंतु व्यापारी आम्हास वारणी घेतल्याशिवाय ट्रकमध्ये माल भरणार नाही, असे म्हणत आहेत. आमचा काहीही संबंध नसताना वाहतूकदारांना वेठीस धरत आहेत. शासनाने कायदा करूनही व्यापारी तो मोडण्यासाठी आपणाकडे पोलीस संरक्षण मागत आहेत. तरी कायदा मोडणाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नये. कृती आराखड्यानुसार आम्हाला वारणी मागणाऱ्या व देण्यास भाग पाडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, पंडित कोरगावकर, विजय भोसले, अभय घारे, आदी उपस्थित होते.

फोटो -२५०८२०२१-कोल-लाॅरी ऑपरेटर्स

ओळी : कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नये, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे बुधवारी करण्यात आली.