शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या धर्तीवर बियाणे वितरीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

दत्ता पाटील लोकमत न्यूज नेटवर्क म्हाकवे : कृषी विभागाने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुदानावर बी-बियाणे देण्याचे नियोजन केले आहे. ...

दत्ता पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हाकवे : कृषी विभागाने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुदानावर बी-बियाणे देण्याचे नियोजन केले आहे. ही स्वागतार्ह बाब असली तरी यासाठी ऑनलाईन नोंदणीची जाचक अट आहे. मुळात शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य होणारे नाही तसेच सध्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून, सर्वर डाऊनही होत आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊनमुळे महा ई-सेवा केंद्र, नेट कॅफे बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाण्यांची ऑनलाईन मागणी करायचे कोठे? हा प्रश्न आहे.

त्यामुळे कर्नाटक राज्याच्या धर्तीवर मे महिन्यातच आणि सातबारानुसार बियाणे मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून, मान्सूनही उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. ऑनलाईनची जाचक अट रद्द करून कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत ऑफलाईन पद्धतीने मागणी अर्ज स्वीकारुन या योजनेचा लाभ द्यावा तसेच कर्नाटकच्या धर्तीवर पेरणीपूर्वी किमान १५ दिवस अगोदर बियाणे शेतकऱ्यांना मिळण्याची व्यवस्था करावी. खतांची टंचाई दाखवून जे विक्रेते चढ्या भावाने खताची विक्री करतात, त्यांच्यावर भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात यावी, अशीही अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, कर्नाटकातील शेतकऱ्यांना गावागावात बियाणे पोहोच झाले आहे तर शेजारीच असणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी ऑनलाईन मागणी अर्ज करण्याच्या धावपळीत आहे. आता बियाणे प्रत्यक्षात कधी मिळणार, याचीही कल्पना येथील शेतकऱ्यांना नाही.

कोट...

अर्ज करण्यासाठी धावपळ, त्याची फी ही सर्व यातायात करून शेतकऱ्यांना प्रतिकिलो सोयाबीनमागे सुमारे १० ते १५ रुपयेच अनुदान तेही त्याने पदरमोड करून बियाणे खरेदी केल्यानंतर त्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

ऑफलाईन अर्ज स्वीकारून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळावे, यासाठी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्यासह कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. लिंकिग तसेच चढ्या भावाने खताची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची गरज आहे.

- संभाजी भोकरे

उपजिल्हाप्रमुख, शिवसेना