शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर कार्यालयात ‘बीएसएनएल’ सेवेचा बोजवारा

By admin | Updated: September 23, 2014 23:52 IST

तक्रार घेण्यासाठीही अधिकारी नाहीरिकाम्या खुर्च्या

राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी तालुक्यात बीएसएनएल सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. मोबाईलना रेंज मिळत नाही, तर दूरध्वनीला सुरळीत सेवा मिळत नाही. कार्यालयातील खुर्च्या रिकाम्याच असल्याने तक्रार करण्यासाठी अधिकारीही उपलब्ध नाही. हे कार्यालय कशासाठी व कोणासाठी सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला असून बीएसएनएलच्या सेवेला कंटाळून ग्राहक इतर खासगी कंपन्यांकडे वळू लागला आहे. विशाळगड, शित्तूरवारुण, उदगिरी, येळवणजुगाई, आदी परिसरातील गावांतील नागरिकांनी बीएसएनएलला रामराम ठोकला आहे.शाहूवाडी तालुक्यात बीएसएनएलचे १७ एक्स्चेंज अंतर्गत सहा हजारांवर दूरध्वनी आहेत. तालुक्यातील बहुतांश लोक मुंबई येथे तसेच सैन्यदलात आहेत. मात्र, बीएसएनएल सेवा ग्राहकांना वेळेत मिळत नाही. याकडे येथील अधिकारी व कामगार ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मलकापूर येथे तालुका अंतर्गत एक्स्चेंज आहे. मोबाईल ही सेवा अत्यावश्यक सेवा बनली आहे. प्रत्येक नागरिकाला फोनसेवा, फॅक्स, इंटरनेट, आदी सुविधा गरजेच्या बनल्या आहेत. मात्र बीएसएनएल सेवेमुळे नागरिक, व्यापारी हैराण झाले आहेत. तक्रार करूनदेखील न्याय मिळत नाही. विरळे परिसरात रेंजचा पत्ताच नाही. मात्र, सर्वत्र दूरध्वनी सेवेचे टॉवर दिमाखात उभे आहेत. उदगिरी गावातील नवीन टॉवर गेली पाच वर्षे बंद आहे. गावा-गावांतील नागरिकांनी आपले घरगुती फोन संबंधित कार्यालयाकडे जमा केले आहेत. हे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत आहेत.मलकापूर मंडल कार्यालयात गेली तीन महिने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असताना देखील वरिष्ठ अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत. नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जाते. येथे असणारे कर्मचारीदेखील नागरिकांना नीट उत्तरे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारींचा ओघयेथील उपमंडल अधिकारी यांची बदली कोल्हापूरला झाल्याने हे पद रिक्त आहे, तर इतर कर्मचारी यांच्या बदल्या झाल्याने सर्व पदे रिक्त आहेत. सध्या या कार्यालयाकडे एक अधिकारी, एक लिपिक, शिपाई व एक टेक्निशियन उपलब्ध आहे. अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे या कार्यालयाचा बोजवारा उडाला आहे. ४मलकापूर येथील एका खासगी लाईनमनवर या कार्यालयाचा कारभार सुरू आहे, तर ग्रामीण भागात ही सेवा पूर्णत: बंद आहे. दररोज तालुक्यातून नागरिकांचा तक्रारींचा ओघ सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी जाणूनबुजून येथे बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी पाठवीत नाहीत. हे कार्यालय कोल्हापूर येथे स्थालांतरित करण्याचा अधिकाऱ्यांचा घाट असल्याची चर्चा सुरू आहे.