शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तालुक्यातील पश्चिम भागाला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

सडोली (खालसा) : करवीर तालुक्यातील पश्चिम भागाला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना, मात्र आरोग्य विभागाने कुरुकली (ता. ...

सडोली (खालसा) : करवीर तालुक्यातील पश्चिम भागाला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना, मात्र आरोग्य विभागाने कुरुकली (ता. करवीर) कोविड सेंटर पूर्ववत न केल्याने रुग्णांना खासगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत असून लोकांचा जीव गेल्यानंतर हे कोविड सेंटर सुरू करणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.

करवीर तालुक्यातील भोगावती खोऱ्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा आकडा भविष्यात मोठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गतसाली आरोग्य विभागाने भोगावती परिसरात कोरोनाचा धोका लक्षात घेऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कुरुकली( ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेऊन सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता भविष्यात परिस्थिती भयावह होण्याची शक्यता असल्याने पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एक महिन्यापूर्वी कुरुकली येथील कोविड सेंटर पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात राजकीय शक्तीचा अभाव असल्याने प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कोरोना केअर सेंटरची उपलब्धता होण्याच्यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. हे कोविड सेंटर पूर्ववत झाल्यास कोल्हापूर शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार असून भोगावती खोऱ्यासह करवीरच्या पश्चिम भागातील गरीब आणि सामान्य रुग्णांना आर्थिक झळ बसणार नाही. शासनाने पुन्हा हे सेंटर पूर्ववत करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.