शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

corona virus -संचारबंदीच्या काळात कोल्हापुरात संचार, पोलिसांनी दिले रप्पाटे, दुचाकी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 6:18 PM

नागरिकांनी भाजीमंडईत गर्दी केली; तसेच रस्त्यांवरून फेरफटका मारला. अखेर पोलिसांनी कडक भूमिका घेत विविध चौकांत अशा बेजबाबदार नागरिकांना ‘सरकारी पाहुणचार’ दिला. दरम्यान, औषध दुकाने, भाजी मंडई वगळता शहरातील सर्व व्यापारी पेठा, तेथील दुकाने कडकडीत बंद राहिली.

ठळक मुद्देसंचारबंदीच्या काळात कोल्हापुरात संचारपोलिसांनी दिले रप्पाटे, दुचाकी घेतल्या ताब्यात

कोल्हापूर : अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा गैरफायदा घेत कोल्हापूरकरांनी मंगळवारी पुन्हा एकदा बेजबाबदारपणाचे प्रदर्शन घडविले. ‘औषध आणायला निघालोय. डॉक्टरांकडे चाललोय, भाजी आणायला आलोय,’ असे सांगत अनेक नागरिकांनी भाजीमंडईत गर्दी केली; तसेच रस्त्यांवरून फेरफटका मारला. अखेर पोलिसांनी कडक भूमिका घेत विविध चौकांत अशा बेजबाबदार नागरिकांना ‘सरकारी पाहुणचार’ दिला. दरम्यान, औषध दुकाने, भाजी मंडई वगळता शहरातील सर्व व्यापारी पेठा, तेथील दुकाने कडकडीत बंद राहिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांचे बेजबाबदारपणाचे लक्षण पाहून सोमवारी (दि. २३) दुपारी चारनंतर राज्यात संचारबंदी जाहीर केली. तिची तत्काळ अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा तसेच भाजीविक्री, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळली. त्याचाच गैरफायदा घेत मंगळवारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अनेक नागरिक रस्त्यांवर उतरले. दुचाकीवरून अनेक तरुण केवळ संचारबंदी कशी असते, हे बघायला येत होते.ताराबाई रोडवरील कपिलतीर्थ, गंगावेशीतील पाडळकर मार्केट, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी नववी गल्ली येथील भाजी मार्केट सुरू होते. सकाळी भाजी विक्रेतेही आपला माल घेऊन बाजारात आले. त्याशिवाय न्यू महाद्वार रोड, राजारामपुरीतील अनेक गल्ल्यांत, रंकाळावेश बसस्थानक, ताराबाई रोड ते जॉकी बिल्डिंग, लक्ष्मीपुरी जयधवल बिल्डिंग परिसर येथेही भाजीविक्रेत्यांनी रस्त्यांवरच ठाण मांडले होते. काही फळविके्रेतेही रस्त्यांवर होते. त्यामुळे तेथे भाजीखरेदीकरिता सकाळच्या सत्रात गर्दी झाली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तरी हेच चित्र दिसत होते.शहराच्या प्रत्येक प्रमुख रस्त्यावर, चौकाचौकांत पोलीस नाकाबंदी करून उभे होते. शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, जोतिबा रोड, मध्यवर्ती बसस्थानक, शाहू मिल चौक येथे तर पोलिसांनी दुचाकीस्वारांवर काठ्या उगारायला सुरुवात केली. सर्व दुचाकास्वारांना ‘तुम्ही रस्त्यांवर का आलाय?’ असे विचारत पोलीस चौकशी करीत होते. तो सहज फिरण्यासाठी आला आहे हे लक्षात आले की, पोलीस लाठीचा प्रसाद देऊन त्यांच्या दुचाकी ताब्यात घेत होते. प्रत्येक ठिकाणी के्रेन होत्या. दुचाकी ताब्यात घेतली की त्या के्रेनच्या साहाय्याने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडे नेल्या जात होत्या.शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या स्वत: मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुल कार्यालयासमोर थांबून उपनगरांतून येणारी सर्व वाहने अडवून त्यांची चौकशी करीत होत्या. त्यांनी अनेक दुुचाकी वाहने ताब्यात घेतली. नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीबद्दल त्या नागरिकांना खडसावत होत्या. ‘कोरोनाची साथ आहे. स्वत:ची काळजी घ्या, त्यासाठीच संचारबंदी लागू केली आहे, गांभीर्याने घ्या’ असे कट्टे नागरिकांना सांगत होत्या.संचारबंदीमुळे संपूर्ण शहर आज सलग चौथ्या दिवशी कडकडीत बंद राहिले. अनेक दुकानदार, कारखानदार दुकानाकडे फिरकलेच नाहीत. हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर बार व परमिट रूम यांसह सर्वच व्यावसायिक संस्थांनी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्ट्या दिल्या आहेत. संचारबंदीमुळे रस्ते ओस पडले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर