शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

corona in kolhapur-यात्रा काळात जोतिबा डोंगर शंभर टक्के ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 7:06 PM

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच्या सासनकाठीधारकांनाही डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे.

ठळक मुद्देयात्रा काळात जोतिबा डोंगर शंभर टक्के ‘लॉकडाऊन’ग्रामपंचायतीचा निर्णय : तीन दिवस प्रवेश बंद

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच्या सासनकाठीधारकांनाही डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे.दख्खनचा राजा श्री जोतिबाची वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा मंगळवारी (दि. ७) होत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा याचा लेखी आदेश वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीला पाठविण्यात आला आहे. सध्या संचारबंदी लागू असली तरी यात्रा काळात काही भाविक डोंगरावर येण्याची शक्यता गृहित धरून ग्रामपंचायतीने यात्रेच्या आदल्या दिवसापासूनच गाव शंभर टक्के लॉकडाऊन केले आहे.

सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही. तर बाहेरुन आलेल्या नागरिकाला डोंगरावर प्रवेश मिळणार नाही. मानाच्या सासनकाठ्या हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते, मात्र सर्व सासनकाठी धारकांना ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी फोन करून डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे. दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात निर्जंतुकीकरणाच्या औषधांची फवारणी करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJyotiba Templeजोतिबाkolhapurकोल्हापूर