शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बटालियनला दिलेली नंदवाळची जागा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील गट क्रमांक ६३ मधील भारत बटालियनला दिलेल्या जागेचा आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील गट क्रमांक ६३ मधील भारत बटालियनला दिलेल्या जागेचा आदेश रद्द करून प्रतिपंढरपूर असलेल्या ‘नंदापूर’च्या विकासासाठी ती द्यावी, अशी मागणी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याकडे केली. जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, त्याचा विचार करून जागेचा आदेश रद्द करावा, अन्यथा उग्र आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला.

नंदवाळ येथील ४६ हेक्टर जमीन भारत बटालियनला दिली आहे, याबाबत चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती, त्यानुसार संबंधित जागेचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकार पवार यांच्याकडे शुक्रवारी आपले म्हणणे सादर केले.

चंद्रदीप नरके म्हणाले, भारत बटालियनने हातकणंगलेसह इतर तालुक्यात जागा बघितल्या होत्या. मग नंदवाळ देवस्थान शेजारीलच जागा का देण्यात आली. आषाढी एकादशीला लाखो, तर दर एकादशीला हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. या जागेवर वाहनतळ, रिंगणसोहळा, भक्तनिवास, व्यापारी निवास, नगर उद्यान आदी गोष्टी करायच्या असताना ही जागा भारत बटालियनला देऊन काेणाला काय साध्य करायचे आहे.

करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नंदापूरमध्ये कोणी चुकीच्या पध्दतीने काम करत असेल, तर खपवून घेणार नाही. प्रसंगी काम बंद पाडू, मात्र मागे हटणार नाही.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे ही जागा ताब्यात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. टोलप्रमाणे रस्त्यावरची लढाई करावी लागली, तरी बेहत्तर मात्र थांबणार नाही. भाजपचे तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील म्हणाले, वारकऱ्यांचा अवमान सहन करणार नाही. या जागेचा आदेश रद्द केला नाही, तर उग्र आंदोलन उभारू. यावेळी सरपंच अस्मिता कांबळे, उपसरपंच सागर गुरव, पोलीसपाटील विनायक उलपे, सचिन शिंदे, सागर पाटील, धनाजी उलपे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री वाकऱ्यांच्या भावनेचा आदर करतील

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी आपण पत्र दिल्यानंतर तातडीने अहवाल मागवला. त्यामुळे ते वारकऱ्यांच्या भावनेचा निश्चित आदर करतील. जिल्हाधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांच्या भावनेचा आदर करून त्याप्रमाणे अहवाल सादर करावा, असे नरके यांनी सांगितले.