शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धापनदिन लेख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST

गेल्यावर्षी कोरोना नावाचा एक विषाणू आला आणि त्यानं जगण्याची पध्दतच बदलून टाकली. एरवी शासकीय असो किंवा खासगी, अगदी जवळ ...

गेल्यावर्षी कोरोना नावाचा एक विषाणू आला आणि त्यानं जगण्याची पध्दतच बदलून टाकली. एरवी शासकीय असो किंवा खासगी, अगदी जवळ जाऊन, बसून बोलायची, अघळपघळ गप्पा मारायची सवय. मात्र कोरोनामुळे सगळं चित्रच बदललं. माणसा-माणसात प्लास्टिकच्या का असेनात, भिंती उभ्या करण्यात आल्या. या बदललेल्या परिस्थितीचा हा आढावा...

गेल्यावर्षी फेब्रुवारीनंतर भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आणि हा थुंकीवाटे पसरणारा विषाणू असल्याने, मग नागरिकांना खूपच बंधने घालून घ्यावी लागली. केंद्र असो वा राज्य, शासनाने यासाठी त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना द्यायला सुरुवात केली. सामाजिक अंतर राखा, सॅनिटायझरचा वापर करा आणि मास्क वापरा... ही ती त्रिसूत्री.

तोंड आणि नाकावाटे म्हणजेच शिंकेद्वारे आणि तोंडातून बोलताना थुंकीचे तुषार उडतात. ते कसेही कुठेही उडतात. त्याचा नंतर स्पर्श होऊन त्याद्वारे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ही दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. आतापर्यंत प्राण्यांना मुसक्या बांधलेल्या आपण पाहत होतो. परंतु माणसाला आरोग्याच्यादृष्टीने मुसक्या जरी नसल्या तरी, मुखपट्टी बांधण्याचे जे बंधन तेव्हा घालण्यात आले, ते अजूनही सक्तीचे आहे. यापुढच्या काळातही याची अंमलबजावणी करावी लागणार असे दिसते.

आम्हा नागरिकांना याची सवय नसल्याने सुरुवातीला घुसमटल्यासारखे होऊ लागले. त्यामुळे टाळाटाळ सुरू झाली. बाहेर पडताना मास्क विसरला की रुमाल बांधायची वेळ आली. नागरिक तरीही दक्षता घेत नसल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने दंडाच्या पावत्या फाडायला सुरुवात केली. मग कुठे मास्क वापरण्यात नियमितता आली. आताही कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने मास्क हनुवटीवर ठेवून फिरणारे अनेकजण आहेत. आठवडा-आठवडाभर मास्क न धुणारेही अनेकजण आहेत. तसेच अनेक महिला बचत गटांनी आणि कंपन्यांनी रंगीबेरंगी मास्कचे उत्पादन सुरू केले. सर्जिकल मास्कपासून कापडी मास्कपर्यंतच्या उत्पादनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल घडली.

सॅनिटायझरचा वापर, याचे एक बंधन घालण्यात आले. कुठेही गेटला, फर्निचरला लागलेले हात जर पुन्हा नाका-तोंडाला लागले, तर त्या माध्यमातून होणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी सातत्याने सॅनिटायझर वापरण्याचीही सक्ती करण्यात आली. अचानक ही मागणी वाढल्यामुळे बाजारात सॅनिटायझरची टंचाई निर्माण झाली. किमती वाढल्या. देशभरात अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे साखर कारखान्यांनी सॅनिटायझर उत्पादन करावे यासाठी सूचना करण्यात आल्या. अनेक नव्या कंपन्या स्थापन झाल्या आणि एक, दोन महिन्यांनी सॅनिटायझर मुबलक प्रमाणात मिळू लागले. अनेक शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये सॅनिटायझर घेऊन एका कर्मचाऱ्याला बसवण्यात येऊ लागले. त्यानंतर मग सॅनिटायझर स्टॅंड आले. नंतर त्यातही सुधारणा झाली. सेन्सरचा वापर करून, विशिष्ट ठिकाणी हात धरला की सॅनिटायझर हातावर पडू लागले. परंतु आता घरा-घरातही गेल्यानंतर सॅनिटायझर वापरण्याची सवय नागरिकांना लागली आहे. यामध्येही अनेक कंपन्यांनी संशोधन करून हे सॅनिटायझर सुगंधी करण्यास सुरुवात केली.

सामाजिक अंतर राखणे सुरुवातीला नागरिकांना अवघड गेले. परंतु जसजसे कोरोना रुग्णांचे आकडे वाढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मृत्यूही सुरू झाले, तेव्हा मात्र याचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आले. साधा कोणाला ठसका लागला तरी, नागरिक त्याच्याकडे संशयाने पाहायला लागले. त्यावरूनही अनेक ठिकाणी भांडणे, वाद, मारामाऱ्या घडल्या. विविध कार्यालयांमधील बैठक रचनाच बदलण्यात आली. ज्या ठिकाणी १० खुर्च्या होत्या, त्या ठिकाणी पाचच खुर्च्या ठेवण्यात आल्या.