शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’वर अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:13 IST

कोल्हापूर : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी स्वाध्याय (स्टुंडटस व्हॉटस्ॲप बेसड डिजिटल होम ...

कोल्हापूर : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी स्वाध्याय (स्टुंडटस व्हॉटस्ॲप बेसड डिजिटल होम असेसमेंट) उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात गेल्या वर्षी कोरोनाच्या कालावधीत झाली. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’वर अभ्यास सुरू आहे.

गेल्या वर्षी दि. १४ नोव्हेंबर रोजी सुरू झालेला ‘स्वाध्याय’ हा उपक्रम मराठी, गणित, विज्ञान विषयाच्या आणि मराठी, सेमी इंग्रजी, उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना दर शनिवारी व्हॉटस्ॲपद्वारे स्वाध्याय उपलब्ध होतो. तो पूर्ण करण्यासाठी त्यांना एक आठवड्याचा कालावधी दिला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीची एकूण विद्यार्थी संख्या ५,७९,४५१ आहे. त्यापैकी आतापर्यंत २,४६,२३६ जणांनी स्वाध्यायसाठी नोंदणी केली आहे. त्यातील २,३५,७३९ जण स्वाध्याय सोडवत आहेत. या उपक्रमात राज्यामध्ये कोल्हापूर हे विद्यार्थी संख्येमध्ये चौथ्या आणि पटसंख्येच्या टक्केवारीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. या उपक्रमामुळे अभ्यासाचा सराव, उजळणीला मदत होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी : ५,७९,४५१

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : २,४६,२३६

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी : २,३५,७३९

प्रतिक्रिया

स्वाध्याय उपक्रम सुरू झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा राज्यात १९ व्या क्रमांकावर होता. आता विद्यार्थी संख्येनुसार चौथ्या, तर पटसंख्येनुसार नवव्या क्रमांकावर आहे. टॉप-थ्रीमध्ये पोहोचण्यासाठी आमचे सातत्याने काम सुरू आहे.

- संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

स्वाध्याय हा विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची शिक्षकांनी नोंदणी करावी.

- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संपादवणूक सर्वेक्षणाच्या तयारीसाठी ‘स्वाध्याय’ महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची या उपक्रमात नोंदणी करण्यासह त्यांच्याकडून स्वाध्याय सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.

विद्यार्थी म्हणतात

स्वाध्याय सोडविल्याने शिकविलेले धडा, कवितांबाबतची अधिक माहिती मिळते. त्याची अभ्यासासाठी चांगली मदत होते.

-शिवम बोबडे, दहावी, अयोध्या पार्क

गेल्या आठवड्यात मी पहिल्यांदा स्वाध्याय सोडविला. खूप छान वाटले. त्यामुळे अभ्यासाची उजळणी, सराव होतो.

-प्रगती हंजे, नववी, शाहूपुरी

चौकट

उर्दूचे ४,५०२ विद्यार्थी

जिल्ह्यात या उपक्रमातील मराठी माध्यमातील विद्यार्थी संख्या २,४२,२६७ आहे. त्यात उर्दू माध्यमाचे ४,५०२ विद्यार्थी आहेत.

===Photopath===

290321\29kol_9_29032021_5.jpg

===Caption===

फोटो (२९०३२०२१-कोल-स्वाध्याय डमी)