शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करु घेऊ नये, असे मनसे आमदार राजू पाटील का म्हणाले?

By मुरलीधर भवार | Updated: September 2, 2024 17:59 IST

कल्याण- १४ गावांबद्दल गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या काही अटी शर्ती आहेत. त्यांची मागणी ...

कल्याण- १४ गावांबद्दल गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या काही अटी शर्ती आहेत. त्यांची मागणी देखील रास्त आहे. परंतू त्याचा अर्थ असा नाही की, गणेश नाईक यांनी १४ गावांना नवी मुंबईत समाविष्ट करुन घेण्यास आणि विकासाला विरोध केला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर गणेश नाईक हे सकारात्मक आहेत. गावांचा विकास कुठे थांबणार नाही. मी स्वत: मुखमंत्र्यांना भेटून विकास निधी मंजूर करुन घेणार. त्या गावात विकास कामे सुरु होणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार पाटील यांनी सांगिले की, गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊली. त्यात त्यांनी १४ गावे नवी मुंबईत घेतली आहेत. त्याबाबतीत त्यांच्या काही अटी शर्ती आहे. त्याची पूर्तता झाल्या शिवाय ही महापालिकेत गावे घेऊ नये. विकास कामे सुरु करु नये. खरे तर नाईक यांची ही भूमिका महत्वाची आहे. १४ गावातील नागरीकांचे ऐकून त्यांनी समर्थन केले आहे. विधी मंडळात २४ मार्च २०२२ रोजी मी प्रश्न मांडला. नाईक हे तेव्हाही बोलले होते. महापालिका आयुक्तांनी जे पत्र दिले होते. त्यात स्पष्ट म्हटले होते. ५९१ कोटी गावांच्या विकासासाठी आणि ६ हजार ९०० कोटी रुपये गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात यावे. तीच मागणी ते पुढे रेटत आहे. या गावातील नागरीकांचा गैरसमज झाला आहे. नाईक यांचा ही गावे काढण्यास विरोध आहे का ? तर नाही. त्यामुळे माझे असे ठाम मत आहे की नाईक यांचा त्याला विरोध नाही. त्यांची मागणी रास्त आहे. परंतू हा पैसा एकदम असा ठपकन येऊन पडणार नाही. टप्प्या टप्प्याने विकास कामे सुरुही होतील. मुख्यमंत्रीनी ७० कोटी रुपये नगरविकास खात्याकडून आणि ७० कोटी रुपये एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केले होते. ही कामे सुरु करण्यासाठी एक निधी वितरीत करावा. आडीवली भूतविली रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी निधी द्यावा. महापालिका आयुक्तांना भेटलो होतो. १४ गावे आणि तळोजा रोडला जोडणारा एक स्पाईन रोड हवा आहे. त्याला काही काळ जाणार आहे. तेव्हढा काळ ही गावांना विकासापासून ताटकळत ठेवणे याेग्य होणार नाही. त्या रस्त्याचा प्रस्तावही टाकण्यास सांगू. ही कामे होणार आहेत.

आम्ही नाईक यांची समजूत काढणार आहोत. त्यांना आम्ही समजून घेतले आहे. ते ही आम्हाला समजून घेतील. भावना दोघांची सारखीच आहे. त्यांचे म्हणणे यासाठी रास्त वाटते की, नवी मुंबई महापालिकेतील नागरीकांचा गेली २० वर्षे ट’क्स वाढलेला नाही. त्या लोकांवर त्यांना बोजा टाकायचा नाही. ते काही चूकत नाही. इथली कामे सुुरु झाल्यावर त्या कामाकरीता सरकारकडून पैसा आल्यावर तो बोझा नवी मुंबईतील नागरीकावर पडणार नाही. जी लोकसंख्या प्रिडीक्ट करीत आहे. तेव्हढी लोकसंख्या या १४ गावाची नाही. नवी मुंबई ही देशातील मोठी महापालिका आहे. त्या ठिकाणी ही अतिक्रमणाचा विषय आहे. तो जसा टप्प्या टप्प्याने संपणार आहे. नाईक एक मवाळ भूमिका घ्यावी. आमचे आणि आमच्या समाजाचे ते नेते आहेत. त्यांच्या भूमिकेला पाठींबा देत मुख्यमंत्र्यांकडून जास्तीत जास्त निधी या १४ गावांच्या विकासाला कसा येईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे