शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वस्तुस्थितीदर्शक अहवालाचे काय झाले?; जास्तीत जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 01:23 IST

काँग्रेस प्रभारींनी मागविला होता अहवाल : जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न

कल्याण : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मार्चपासूनच तयारीला सुरुवात केली होती. ४ मार्चला मुंबईतील गांधी भवनमध्ये कल्याण-डोंबिवलीतील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये विशेष बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना जास्तीतजास्त जागा आपल्या वाट्याला आल्या पाहिजेत, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर पक्षाचे कोकण विभाग प्रभारी बी.एन. संदीप यांनी वॉर्डनिहाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, अहवाल सादर झाला, पण ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

राष्ट्रवादीच्या साथीने २००५ मध्ये केडीएमसीत अडीच वर्षे का होईना सत्तेत असलेल्या काँग्रेसची कालांतराने अधोगती झाली. १९९५ मध्ये १६, २००० मध्ये १८, २००५ मध्ये २१, २०१० ला १५, तर २०१५ च्या महापालिकेच्या निवडणुकीत तर अवघे चार नगरसेवक निवडून आले. मात्र, २०१९ ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवरही बळ मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांप्रमाणे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही महाविकास आघाडी म्हणून केडीएमसीची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिकेची निवडणूक होणार होती. परंतु, कोरोनामुळे ती झाली नाही. परंतु, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये काँग्रेसची अंतर्गत बैठक झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून लढताना आपल्या पक्षाला जास्तीतजास्त जागा मिळाव्यात, असे मत जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी मांडले होते. या बैठकीत मांडलेल्या सूचना लक्षात घेता लवकरात लवकर वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्यावा, जेणेकरून पुढील नियोजन करता येईल, अशा सूचना पक्षाचे कोकण प्रभारी संदीप यांनी केल्या होत्या. त्यावर अहवाल मार्चमध्ये सादर करण्यात आला, परंतु कोरोनामुळे या संदर्भातील कोणतीच कृती झालेली नाही. आता लवकरात लवकर त्या अहवालावर कृती व्हावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.

जिल्हाध्यक्षांनी याकडे वेधले होते लक्षमुस्लिमबहुल विभाग आणि २०१५ च्या निवडणुकीत शिवसेना जेथे दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशा जागा मिळाव्यात. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी, तर आरक्षण सोडतीनंतर पक्षातील प्रमुख नेत्यांचा भव्य मेळावा कल्याणमध्ये घ्यावा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आंदोलन करण्यास मर्यादा आहेत. परंतु, पक्षातील १२ मंत्र्यांनी कल्याणमध्ये विशेष जनतादरबार घेऊन नागरिकांना भेडसावणारे स्थानिक समस्यांचे मुद्दे निकालात काढावेत, याकडेही पोटेंनी लक्ष वेधले होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना