शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

...म्हणून कमी पाऊस पडूनही कल्याण डोंबिवली गेली पाण्याखाली; समोर आलं महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 5:24 PM

शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यानं अफवांचं पीक

- मयुरी चव्हाण 

कल्याणकल्याणडोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बहुसंख्य परिसरात पावसाचे पाणी शिरून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र गुरुवारी कल्याण डोंबिवली परिसराचे जनजीवन विस्कळीत झालेलेपाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे या गुरुवारी पावसाचा जोर कमी असला तरी शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाणी साचत असल्याने अफवांचे पीकदेखील आले होते. मात्र भरतीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि हे पाणी शहरात शिरल्याचे दिसून आले आणि गुरुवारी पावसाने काहीशी विश्रांती घेऊनही भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेली वाढ आणि त्यासोबत आलेली भरती यामुळे कल्याण डोंबिवली शहर पाण्याखाली गेले.

गुरुवारी सकाळपासून कल्याण पूर्व परिसर, डोंबिवलीतील देवीचा पाडा, कुंभारखाणपाडा, एमआयडीसी, टिटवाळा, शहाड, ठाकुर्ली या परिसरात पाणी साचले होते. चाळी व गृहसंकुल पाण्याखाली गेली होती. गुरुवारी मुसळधार पाऊस झाला नाही तरीही पाणी का साचतय असा सवाल निर्माण झाला होता. यातच गेले काही दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले गेले असल्याची व त्यामुळे शहरात पूरस्थिती गंभीर होणार अशी अफवा सर्वत्र पसरली होती. जो तो प्रत्येकाला ही माहिती देऊन भीतीचे वातावरण निर्माण करत होता. अखेर ही अफवा असून बारवी धरण अद्याप पूर्ण भरले नाही असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. गुरुवारी पावणे एक ते तीन ही वेळ भरतीची होती. कल्याण डोंबिवली शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे वालधुनी , उल्हास नदी ,काळू नदी देखील शहाराला लागून आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच नदी, खाडीकिना-यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यात गुरुवारी भरती असल्याने सुमारे 4. 7 मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हे पाणी हळूहळू शहरात शिरले अन जनजीवन विस्कळित झाले.

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली