शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: नव्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:49 IST

कल्याण-डोंबिवली शहरे : नियमांची माहिती वेळेत पोहोचलीच नसल्याच्या तक्रारी

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सोमवारी रात्री ८ पासून मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, नव्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. नव्या नियमांची माहिती प्रशासनाकडून वेळेत आमच्यापर्यंत पोहोचली नाही, अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. मिनी लॉकडाऊनच्या विरोधात नाराजी व्यक्त करताना व्यापाऱ्यांनी त्यात काही प्रमाणात सूट देण्याची मागणी केली आहे.कोरोना रुग्णांची संख्या मनपा हद्दीत झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री कर्फ्यू, तर दिवसा जमावबंदी आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शुक्रवार ते सोमवार वीकएण्ड लॉकडाऊन असणार आहे. मात्र, सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुकाने सुरू राहतील, असा व्यापाऱ्यांचा समज होता. परंतु, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने सोमवार रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील, असा आदेश केडीएमसीने सोमवारी काढला. मात्र, हा आदेश त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचला नाही. या आदेशाबाबत संभ्रमही होता. त्यामुळे काही ठिकाणी दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवली होती. पोलिसांनी उद्घोषणा करून दुकाने बंद करा; अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. तेव्हा त्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे सोमवारी मनपाने काढलेल्या नव्या आदेशामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. सरकारने तशा प्रकारचे आदेश काढताना त्यात सुस्पष्टता ठेवली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.‘१२ ते ४ व्यवसाय करू द्या’कपड्यांच्या दुकानदारांनी सांगितले की, मार्च २०२० मधील लॉकडाऊन कडक होता. त्यामुळे मागच्या वर्षी लग्न सराईत आम्हाला मोठा फटका बसला. आताही लग्न सराई आहे. अनेकांनी लग्नाच्या कपड्यांची ऑर्डर दिली आहे. आता त्यांना कपडे कसे देणार, असा प्रश्न आहे. लग्नसराईतील व्यवसायावर पाणी फेरणार आहे.  अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांतून कोरोना पसरतो का, असा सवाल कल्याणमधील व्यापाऱ्यांनी केला आहे. दुकानदारांनी किमान दुपारी १२ ते ४ दरम्यान तरी व्यवसाय करू द्यावा. सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याची मुभा द्यावी. रिक्षा, लोकल, खाजगी व सरकारी बससेवा सुरू आहे. मग आमच्यावर गंडांतर का? प्रशासनाने मिनी लॉकडाऊनचा आदेश काढताना दुजाभाव केला आहे, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.