शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांच्या प्रश्नावर तोडगा नाही अन् कारवाई ही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही सुटत नसून, हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीच्या होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही सुटत नसून, हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीच्या होत जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. गाळेधारकांच्या प्रश्नावर प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी कोणताही तोडगा काढण्यास तयार नाही. दुसरीकडे गाळेधारकांचे बेमुदत संप सुरूच असून, मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी दिलेला दोन दिवसांचा अल्टिमेटमही आता संपला आहे. याबाबत महापालिका कारवाईही करत नाही आणि दुसरीकडे गाळेधारकांच्या संपाबाबत गाळेधारकांशी कोणतीही चर्चा करत नसल्याने हा प्रश्‍न अधिकच गंभीर होत जात आहे.

महापालिकेच्या मुदत संपलेला मार्केटमधील गाळेधारकांची प्रश्न हा गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही महापालिकेच्या बाजूने निर्णय देत गाळे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनही कोणतीही कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे दिसून येत नाही, तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाड्यापोटी दिलेली बिले ही अवाजवी असल्याने, गाळेधारक बिलांची रक्कम भरण्यास तयार नाही. त्यातून मधला मार्ग काढण्याबाबत मागचे सत्ताधारी किंवा विद्यमान सत्ताधारी हेही कोणतेही प्रयत्न करत नसल्याचेच दिसून येत आहे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गाळेधारकांना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही बैठकही अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. गाळेधारकांना प्रश्न प्रलंबित होत असल्याने, महापालिकेचा आर्थिक परिस्थितीवरही मोठा परिणाम होत आहे, तर दुसरीकडे गाळेधारकांच्या जीवही भांड्यात पडला आहे.

मनपाकडून केवळ अल्टिमेटमच

महापालिका प्रशासनाने गाळेधारकांनी नुकसान भरपाईची रक्कम भरण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या, तसेच ही रक्कम लवकर भरण्याच्या सूचना देऊन, रक्कम न भरल्यास गाळे ताब्यात घेण्याबाबतचे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले होते. महापालिका प्रशासनाकडून आतापर्यंत गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम मिळण्याबाबत अनेक वेळा अल्टिमेटम दिले आहेत. मात्र, महापालिकेलाही कोणतीही ठोस कारवाई करता आलेली नाही. महापालिका आयुक्त महापालिकेची आर्थिक परिस्थिती गाळे प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत सुधारणार नाही, असे सांगतात. मात्र, ही रक्कम वसुलीबाबत कोणतीही कारवाई करायला महापालिका प्रशासन धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

गाळेधारकांनी स्वतः सुरू केली आता लढाई

महापालिकेच्या मुदत संपल्या मार्केटमधील गाळेधारकांनी हा प्रश्न कायमसाठी सुटावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा आपले प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधींकडून हा प्रश्न सुटताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे, हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीही फारसे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. गाळेधारकांच्या प्रश्न हा लोकप्रतिनिधींसाठी राजकीय मुद्दा झाला असून, हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यातच राजकीय पदाधिकारी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे आता गाळेधारकांनी आपली लढाई आता स्वतः सुरू केली असून, गेल्या दहा दिवसांपासून शहराचे १६ मार्केटमधील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला आहे. विशेष म्हणजे, या संपाकडे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाही, तसेच महापालिका प्रशासनही या संपाकडे लक्ष देत नाही, तसेच कारवाईही करत नाही. यामुळे हा प्रश्न प्रलंबितच राहण्याची शक्यता आहे.