शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात ७ हजार ४४० घरांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

अमळनेर : तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पारधी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत बेघर लोकांना ...

अमळनेर : तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पारधी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत बेघर लोकांना साडेसात हजार घरे देण्याचे तालुका पंचायत समितीचे उद्दिष्ट असून सुमारे ३ हजार ८४० घरे पूर्ण झाली असून नागरिकांना ती रहिवासासाठी देण्यात आली आहेत.

२०१६ ते २०२१ या पाच वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य व्यक्तींसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ५ हजार ९१४ घरांचे उद्दिष्ट आहे. त्यातील २९८९ घरे पूर्ण झाली आहेत तर २२२८ घरे अपूर्ण आहेत. शबरी आवास योजना तालुक्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती, आदिवासी लोकांसाठी शबरी आवास योजनेंतर्गत ५४१ घरांचे उद्दिष्ट आहे. नोंदणी मात्र ६५५ लोकांची झाली आहे. त्यात ३५६ घरे पूर्ण झाली आहेत तर १८५ अपूर्ण आहेत. रमाई घरकूल योजना अनुसूचित जाती मागासवर्गीय लोकांसाठी रमाई घरकूल योजना आहे. त्यासाठी ८६१ घरचे उद्दिष्ट आहे तर ९१८ जणांची नोंदणी झाली आहे. ३९२ घरे पूर्ण झाली आहेत. ४६९ घरे अपूर्ण आहेत. पारधी आवास योजना ही योजना फक्त पारधी समाजासाठी असून २०१६ ते २०१९ या तीन वर्षासाठी १२४ घरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १०३ घरे पूर्ण झाली आहेत तर २१ घरे अपूर्ण आहेत. तालुक्याची ग्रामीण भागात लोकसंख्या १ लाख ९२ हजार असून ७ हजार ४४० कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट आहे. ७ हजार२२४ लोकांनी नोंदणी केली आहे. ६ हजार ८८९ लोकांची जिओ टॅगिंग झाली आहे. बँक खाते तपासून ६ हजार ४५४ लोकांना मंजुरी दिली आहे. ६ हजार १८८ लोकांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. ३ हजार ८८४ लोकांनी घरे बांधून घेतली आहेत त२ हजार ९०३लोकांची घरे अपूर्ण आहेत. प्रत्येक व्यक्तीजवळ किमान २६९ स्क्वेअर फूट जागा असावी किंवा त्यांना गावठाण , ग्रामपंचायतमार्फत जागा दिली जाते किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेत ५० हजार रुपये दिले जातात. प्रत्येकाला एकूण दीड लाख रुपये अनुदान दिले जाते.

पैसे घेतले, पण बांधकाम नाही

अनेक लोकांनी पहिला हप्ता घेऊनही घरे बांधलेली नाहीत. अमळनेर तालुक्यात महाराष्ट्रात सर्वप्रथम सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सर्व घरे व वास्तू एकाच प्रकारची दिसावी म्हणून ग्रामपंचायती, घरकुले याना मरून आणि स्किन कलर देण्यात आली आहेत.

१९-२० मध्ये घरकूल योजनेत अमळनेर तालुका नाशिक विभागात प्रथम आला होता. महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्याचा उल्लेख यशोगाथा सदरात केला होता. ज्या लाभार्थींनी पहिला हप्ता घेऊनही घर बांधलेले नाही त्यांनी त्वरित घर बांधावे अन्यथा हप्ता परत घेतला जाऊ शकतो.

- संदीप वायाळ, सहाययक गटविकास अधिकारी,