शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 17:11 IST

धरणगावात सुरु केलेल्या जनता कर्फ्यूला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी धरणगावात सुरु केलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद होती.

तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यात एकमेव उपाय म्हणून नगरपालिका व पोलिस प्रशासनाने जनता कर्फ्यू घोषित केला. शहरात गुरुवार म्हणजे बाजाराचा दिवस असतो आणि खूप मोठी गर्दी होत असते. म्हणून गुरुवारीच जनता कर्फ्यू लागू करायचा, असे ठरवण्यात आले. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी शहरवासीयांना कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार गुरुवारी जनता कर्फ्यूला व्यापारी वर्गासह नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत दिवसभर आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवले.

बाजारपेठेतील सर्व लहान-मोठे दुकानदार, व्यापारी, भाजीपाला विक्रेते, हातगाडीवर विक्री करणारे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, गॅरेज, फळ विक्रेते तसेच छोटेमोठे सर्व व्यापारी यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून जनता कर्फ्यूला सहकार्य केले. अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल, दूध केंद्रे वगळली तर पूर्ण बाजारात शुकशुकाट होता. या पुकारलेल्या बंदचे अनेकांनी स्वागत केले असून कोरोना टाळण्यासाठी हा एकमेव पर्याय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई यावेळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केली.

दर गुरुवारी अशाच प्रकारचा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी जनार्दन पवार तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बंद पाळण्यासाठी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संजय मिसर, जयेश भावसार, योगेश तळेगाव, समसुद्दिन शेख, आण्णा महाजन, रामकृष्ण महाजन, विशाल पचेरवार, संदीप करोसिया, सिकंदर पवार, अनिल पाटील, सुरेश सोनवणे यांचे सहकार्य लाभले

कोरोनाची दुसरी लाट येत असल्याने रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वारंवार सांगूनदेखील नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या जनता कर्फ्यू ची अत्यंत आवश्यकता आहे. शहरात सगळ्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून शासनास सहकार्य केलेले आहे.

मंगल बाळकृष्ण भाटिया,

अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, धरणगाव.

शहरात कोरोनाची दुसरी लाट येते, अशी भीती निर्माण झाली आहे. बाजारपेठेत गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे सर्व टाळण्यासाठी जनता कर्फ्यू लावणे आवश्यक होते, यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळले पाहिजे.

निंबा जंगलू निकम,

नागरिक, धरणगाव

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावcorona virusकोरोना वायरस बातम्या