शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या विद्युत खांब हटविण्याच्या कामाचा ‘श्रीगणेशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST

शिवाजी पुलापासून टॉवरपर्यंत अंडरग्राऊंड हायटेन्शन लाईन : मुखर्जी उद्यानात बसविणार ट्रान्सफाॅर्मर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामातील ...

शिवाजी पुलापासून टॉवरपर्यंत अंडरग्राऊंड हायटेन्शन लाईन : मुखर्जी उद्यानात बसविणार ट्रान्सफाॅर्मर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामातील प्रमुख अडथळा ठरलेल्या विद्युत खांबाच्या स्थलांतराच्या कामाला बुधवारपासून अखेर सुरुवात झाली आहे. या कामांतर्गत शिवाजीनगर उड्डाण पुलापासून ते टॉवरपर्यंतच्या रस्त्यात एकही विद्युत खांब उभारला जाणार नसून उच्च दाबाची विद्युत लाईन ही अंडरग्राऊंड टाकली जाणार आहे. तसेच ग्राहकांना कनेक्शनसाठी ठिकठिकाणी फिडर पिलर उभारले जाणार आहेत. हे काम १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्यावर महावितरणचा भर असून, हे काम झाल्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला २५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरुवात झाली होती. हे काम १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अडीच वर्षे होऊनदेखील या पुलाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलेले नाही. या पुलाचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, पुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतराचे काम तब्बल वर्षभर रखडल्याने या पुलाचे काम मुदतीत होऊ शकलेले नाही. ‘लोकमत’ने सातत्याने या प्रश्नाकडे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून अखेर या विद्युत खांब हटविण्याचा कामाला मनपाकडून निधी वर्ग करून, कामाला सुरुवात झाली आहे.

मनपाने करून दिली जागा निश्चित

अनेकदा महावितरणकडून कामे करताना त्याची स्थानिक स्वराज्य संस्थेला माहिती दिली जात नाही. त्यामुळे भविष्यात जागेच्या विस्ताराचा विषय येताच अडचणी समोर दिसतात. त्यामुळे आगामी काळातील समस्या टाळण्यासाठी महावितरणने खांब शिफ्टिंगचे काम करण्यापूर्वी स्थळ निश्चिती करावी असे पत्र दिले होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सफाॅर्मर बसविण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाचे स्थळ निश्चित करून दिले आहे. यासह शारदा बुक डेपो व शहर पोलीस ठाण्याजवळदेखील ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात येणार आहे.

मार्चपर्यंत पूल होणार वाहतुकीसाठी खुला

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम हे विद्युत खांब स्थलांतराच्या कामामुळे रखडले होते. आता हे काम महावितरणकडून १५ ते २० दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यास पुलाच्या उर्वरित कामाला सुरुवात होऊ शकते. तीन महिन्यांत पूर्ण होऊन मार्च महिन्यात शिवाजीनगर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.