शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
5
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
6
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
7
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
8
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
9
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
10
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
11
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
12
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
13
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
14
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
15
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
16
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
17
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
18
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
19
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
20
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

न्हावी येथे वीज मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 3:23 PM

दोषयुक्त २२ मीटरची मागणी करूनही मिळत नसल्याचे चित्र आहे.

न्हावी, ता.यावल : शेतात पिकांना विहीर, कूपनलिकेद्वारे पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता असतानाही वीज मीटर मागूनही मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, परिसरातील अर्धा डझन गावातील दोषयुक्त असलेले २२ मीटर बदलून मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांच्या विनवणीकडे वीज कंपनीने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गावात वीज मीटर लवकर मिळत नसून , संबंधितांनी लक्ष घालावे, अशी मागणी आहे.परिसरात न्हावी गाव तसे संपूर्ण शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. वीज वितरण कंपनीच्या न्हावी कार्यक्षेत्राच्या अंतर्गत न्हावी गावासह मारुळ, बोरखेडा, तीळ्या, अंधार मळी व मोहमांडली अशी सहा गाव येतात.न्हावी कार्यालयाच्या अंतर्गत एक साहाय्यक अभियंता,  एक लाईनमन, सात वरिष्ठ तंत्रज्ञलागतात. त्यातील सात वरिष्ठ तंत्रज्ञापैकी सहा तंत्रज्ञ असून, वरिष्ठ तंत्रज्ञाचे एक पद रिक्त आहे. तीन कनिष्ठ तंत्रज्ञ आहेत. यापैकी एक भरलेले असून, दोन पदे रिक्त आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ व कनिष्ठ तंत्रज्ञ अशी एकूण तीन पदे रिक्त आहेत. असे असले तरी अशा तीन  रिक्त जागी बाह्य तीन विद्युत कर्मचारी कार्यरत आहेत. न्हावी कार्यालयाच्या अंतर्गत असे एकूण १२ जण कार्यरत आहेत.गावातून नवीन वीज जोडणीची सतत मागणी असते. सध्या नवीन जोडणी ऑनलाइन असल्याने  नवीन मीटर  जोडणी ही मीटर नसल्याने पेंडिंग आहे.  आमच्याकडे मीटर नाही. आले की आम्ही लगेच क्रमाने मीटरची जोडणी करतो. मीटर आपल्याकडे  स्टोअरला मीटर शिल्लक पाहिजे असा नियम  नाही. ऑनलाइन नोंदणी असल्याने आम्ही मागणीही करीत नाही. ती पोर्टलवर किती नवीन मीटरची मागणी आहे ते दिसते.  १२ एप्रिलला १६ मीटर आले. त्यातील नवीन १३ घरगुती मीटर  दोन खेपचे व एक टेस्टिंगचे असे १६ मिटर बसवले असून,  १२ एप्रिलपासून एकही मीटर शिल्लक नाही. आम्ही दोषयुक्त २२ मीटर  नवीन मिळावे यासाठी वरिष्ठांना कळविले आहे. मीटरची वेळोवेळी मागणी करूनसुद्धा मीटर मिळत नाही.-धनंजय चौधरी, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी कार्यालय, न्हावी, ता.यावल

३१ मार्चला घरमालकाच्या नावाने  डिमांड नोट  भरली असून, वीज मीटर मिळाले नाही. लवकर मिळणे अपेक्षित आहे. त्यामध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे. -पंडित चौधरी, वीज ग्राहक, न्हावी,  ता.यावल

टॅग्स :FarmerशेतकरीYawalयावल