शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सेना-राष्ट्रवादीची आघाडी होईल न होईल पण स्वबळाची तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगामी काळात सेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार किंवा नाही हे भविष्यात समजेल मात्र आपणही स्वबळाची तयारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आगामी काळात सेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार किंवा नाही हे भविष्यात समजेल मात्र आपणही स्वबळाची तयारी ठेवावी असा सुचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यालयातील शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील आणि इंदिरा पाटील यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशावेळी दिला. राष्ट्रवादी कार्यालयात स्वबळाचा इशारा देणाऱ्या भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या ओबीसी आरक्षण परिषदेतवेळी मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तोंडभरून स्तुती केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी सकाळी छगन भुजबळ यांनी भेट दिली. त्या सोहळ्यात चोपड्याचे कैलास पाटील आणि इंदिरा पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. कैलास पाटील हे गेल्या काही वर्षांपासून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. मात्र, ही नाराजी काही काळाची नव्हती. गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यांचा हा सूर होता. त्यांना सहजतेने राष्ट्रवादीत आणले गेले. हा शिवसेनेला एक धक्का मानला जात आहे. यावेळी भुजबळ यांनी भविष्यात कदाचित स्वबळावर लढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी आतापासूनच तयारी करून ठेवलेली बरी, असा सुचक इशारा यावेळी दिला.

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात छगन भुजबळ यांनी आपले कॅबिनेटमधील सहकारी गुलाबराव पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांचा ओबीसींच्या प्रश्नावर कसा पाठिंबा असतो, याचे दाखले देखील दिले. त्याचसोबत भाजपवर टीका केली. जर तुम्ही येथे काम केले तर तुमच्याकडे इन्कम टॅक्स विभाग येईल. त्याला जर घाबरत असाल तर थेट भाजपात जा.. तेथे अगदी क्लीन व्हाल, असे वक्तव्यही केले.

सकाळी अजिंठा विश्राम गृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र सदनात काहीही चुकीचे नाही. पण, मी आता त्या निर्मिकावरच सर्व काही सोपवले आहे. नियतीच काय ते बघून घेईल. कुणाच्याबद्दल मनात राग नाही.’

कपिल पाटील यांनी जीव वाचवला

छगन भुजबळ यांनी आमदार कपिल पाटील यांनी जीव वाचवला असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘तुरुंगात असताना तब्येत खालावली होती. त्याची माहिती आमदार कपिल पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच त्यावर विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर शरद पवार यांनीही राज्य सरकारला पत्र लिहिले. मग औषधोपचार वेळेत मिळाले.’