शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सभासदांचे म्हणणे ऐकूण न घेता मंजूर केले ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST

जळगाव : शेतकऱ्यांची बँक म्हणविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडू न देता व केवळ ...

जळगाव : शेतकऱ्यांची बँक म्हणविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडू न देता व केवळ मोजक्या संचालकांचे म्हणणे ऐकूण घेत ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप शिरुड विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रा. सुभाष पाटील यांनी केला आहे. ऑनलाईन पद्धतीच्या या सभेत सभासदांचे मोबाईल म्यूट करून ठेवल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ५ सप्टेंबर रोजी बँकेच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर होत्या. यावेळी उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक गुलाबराव देवकर, ॲड. रवींद्र पाटील, संजय पवार, नानासाहेब देशमुख, आमदार सुरेश भोळे, राजेंद्र राठोड, गणेश नेहते, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख सभागृहात उपस्थित होते, तर जवळपास ३५० सभासद ऑनलाईन सहभागी झाले होते.

सर्व ठराव मंजूर

२०२१-२२ या वर्षासाठी बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षणासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती करण्यासह अजेंड्यातील सर्व ९ ठराव मंजूर करण्यात आले.

मोजक्या सभासदांनी मंजूर केले ठराव

बँकेच्या या बैठकीला सभासदांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी सांगितले. मात्र, केवळ संचालकांचे मोबाईल सुरू ठेवत इतरांचे म्हणणे ऐकून न घेण्यासाठी त्यांचे मोबाईल म्यूट करून ठेवण्यात आल्याचा आरोप शिरुड विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रा. सुभाष पाटील यांनी केला आहे. यावेळी उपस्थित सभासदांनी ठरावांना मंजुरी दिली व हे ठराव संमत करण्यात आल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असो की त्यांना मिळणाऱ्या कर्जाचा विषय असो, या संदर्भात मुद्दे मांडायचे असताना सभासदांना बोलू दिले गेले नाही. मयत सभासदांच्या वारसांना निम्मेच कर्ज दिले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, एटीएममुळे शेतकऱ्यांना विनाकरण भुर्दंड सहन करावा लागत आहे, असे अनेक प्रश्न असताना बँक त्याकडे लक्ष देत नसल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला एकप्रकारे बगल देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत मात्र बँकेच्यावतीने इन्कार करण्यात आला आहे.

ऑनलाईन बैठकीसाठी सभासदांना सहभागी व्हायचे होते. मात्र, प्रा. सुभाष पाटील हे शेतात व त्यांचा आवाज व्यवस्थित येत नव्हता. वारंवार लिंक तुटत होती. कोणाचाही मोबाईल म्यूट केला नव्हता.

- जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी बँक.