शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात बिलाची वसुली करा,अन्यथा वीज पुरवठा खंडित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:19 IST

जळगाव : घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकीचा आकडा वाढला आहे. येत्या तीन दिवसात जळगाव परिमंडळातील ...

जळगाव : घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकीचा आकडा वाढला आहे. येत्या तीन दिवसात जळगाव परिमंडळातील सर्व लहान- मोठे औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करण्याचा प्रयत्न करा, जे थकबाकीदार वीजबिल भरणार नाहीत. अशा ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करा,असे आदेश महावितरणचे सर व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी जळगावातील मुख्य कार्यालयाती बैठकीत दिले. तसेच यावेळी त्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही या बैठकीत दिल्या.

कोरोनामुळे यंदा शासनाच्या सुचनेनुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता महावितरणने ग्राहकांना मार्च ते जुन पर्यंत सरासरी वीजबिल दिले. मात्र, महावितरणने दिलेले सरासरी बिल हे जादा असल्याच्या तक्रारी करित, अनेक ग्राहकांनी गेल्या वर्षी जूनपासून वीजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह एकूण साडेतेराशे कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहचला आहे. या वसुलीसाठी महावितरणतर्फे थकबाकीदारांविरोधात कारवाई मोहिमही सुरू आहे. मात्र, २८ फेब्रुवारी पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी जळगावी येऊन सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रकाश पौणिकर, अनिल बोरसे, चंद्रशेखर मानकर,उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार उपस्थित होते. यावेळी बोडके यांनी जिल्हानिहाय थकबाकीची माहिती घेऊन, आता पर्यंत झालेल्या वसुलीची माहिती घेतली. यानंतर बोडके यांनी मागील १० महिन्यात थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी १०० टक्के वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नसल्याचेही बोडके यांनी सांगितले.

इन्फो :

वीजमीटरही काढुन आणण्याच्या सुचना

या बैठकीत बोडके यांनी ज्या ग्राहकांनी लॉकडाऊपासून वीजबिलच भरलेले नाही, अशा थकबाकीदार ग्राहकांना थेट वीज पुरवठा खंडित करुन, घरात वीजमीटरही न ठेवता काढुन आणण्याच्या सुचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही केले.