शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

तब्बल 24 तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:11 PM

रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासापासून खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सुरळीत झाला.

ठळक मुद्देभुसावळकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वासचौपदरीकरणात अंडर ग्राऊंड केबलमध्ये झाला होता बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ  : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासापासून खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सुरळीत झाला. यामुळे अंधारात चाचपडत असलेल्या निम्मे भुसावळवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

 महामार्गाचे काम सुरू असून खेडी  १३२ उपकेंद्रावरून तापी नगर केंद्राला वीज जोडणी करणार्‍या अंडर  ग्राउंड ३३ के.व्ही. टेबल किट २३ रोजी सकाळी अकराला जळाली. याचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर झाला. यामुळे अर्धे भुसावळकर हे अंधारात होते. 

दुरुस्तीसाठी जळगावहून विशेष पथक

 दुरुस्तीसाठी जळगाव येथून विशेष पथक बोलावण्यात  आल्यानंतर  अथक परिश्रम केल्याने १७७ मीटर ३३ के.व्ही.ची नवीन केबल टाकल्यानंतर अखेर २४ रोजी दुपारी दुपारच्या सुमारास गेल्या २४ तासापासून खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत झाला. 

तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी 

दरम्यान, खंडित पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत करण्यासाठी साकेगाववरून वीज जोडणी  करण्यात आली होती. विद्युत वितरण कंपनीचे  कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे, विभागीय अभियंता रवींद्र पद्मे व लाईनमनसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा जळालेली केबल बदलण्यासाठी घटनास्थळी   युद्धपातळीवर कार्य करून वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

दुष्काळात तेरावा महिना

शहरात तापी पात्रामध्ये मुबलक पाणी असूनसुद्धा शहरवासीयांचा घसा कोरडाच आहे. कधी जीर्ण जलवाहिनी लिकेज होते, तर कधी ट्रांसफार्मरमध्ये बिघाड होतो, तर कधी महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यात नको त्या ठिकाणी जलवाहिनी फुटते. अशा अनेक कारणांमुळे शहराला होणारा पाणीपुरवठा रोटेशननुसार एक ते दोन दिवस पुढे टाकला जातो. यातच दुष्काळात तेरावा महिना वीजपुरवठा खंडित झाल्याचा  परिणाम सरळ पाणीपुरवठ्यावर झाल्यामुळे ज्या भागात बुधवारी सकाळी रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येणार होता तो आता पुढे़ ढककला गेला आहे. तसेच येणारे पाणीसुद्धा गढूळ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.  

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळelectricityवीजmahavitaranमहावितरण