शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

त्या २० कि.मी.च्या रस्त्यावर ७० पेक्षा अधिक अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेल्या शहरातील २० कि.मी.च्या त्या ६ रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांना मनपाने अतिक्रमण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेल्या शहरातील २० कि.मी.च्या त्या ६ रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांना मनपाने अतिक्रमण काढून घेण्यासाठी तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून न घेतल्यास मनपाकडून ते अतिक्रमण काढण्यात येईल, असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे.

शहरातील २० कि.मी.च्या ६ रस्त्यांचा विषय ‘लोकमत’ने लावून घेतल्यानंतर शासनाच्या अंदाज समितीच्या व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय चांगलाच गाजला होता. शासन निर्णयानुसार हे ६ रस्ते मनपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनपाने या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. गेल्या आठवड्यात महापालिकेचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली होती. पाहणीदरम्यान शहरातून गेलेल्या ६ रस्त्यांवर ७० पेक्षा अधिक पक्के व किरकोळ अतिक्रमणे आढळून आली आहेत. निमखेडी ते शिवाजीनगर टाॅवर चौक ते काव्यरत्नावली चौक असोदा रेल्वे गेट ते टॉवर चौक अजिंठा चौफुली ते कुसुंबा नाका व इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेज यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोजणी, तसेच अतिक्रमणांची नोंद मनपाने केली असून, तीन दिवसांत अतिक्रमणधारकांनी हे अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याचा सूचना मनपाकडून देण्यात आल्या आहेत, तसेच मनपाकडून शहरात गणेश विसर्जनानंतर या सर्व मार्गांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.