शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

अमळनेर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे शासनाने शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, मंगळवार १५ पासून पुन्हा ...

अमळनेर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे शासनाने शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, मंगळवार १५ पासून पुन्हा ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात होऊन विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिसणार आहेत.

तालुक्यात एकूण २६२ शाळा असून पहिली ते बारावीपर्यंत सुमारे ५५ हजार ४२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १३३ जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिकेच्या ६ शाळा, २ शासकीय आश्रम शाळा तर १२१ इतर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, खासगी प्राथमिक शाळा आहेत.

ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला असला, तरी विविध शाळांमध्ये पहिली, पाचवी, आठवीपासून शाळा असल्याने प्रवेश झालेले नाहीत. दहावीचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे अकरावीच्या कला, शास्त्र, वाणिज्य प्रवेश प्रक्रिया झालेल्या नसल्याने नेमके किती विद्यार्थी वर्गात आहेत, याबाबत शिक्षकही गोंधळात आहेत.

बाजारात पुस्तके नाहीत, त्यामुळे मुलेदेखील पुस्तकांविना कसे शिकणार? हीदेखील समस्या आहे. अनेक मुलांनी जुनी पुस्तके हरवली, रद्दी केली. त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांची पुस्तके पुढील विद्यार्थ्यांना देणे शक्य होणार नाही.

पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे

१ ली - अद्याप प्रवेश नाही

२ री- ४०१७

३ री - ४१९०

४ थी- ४४२७

५ वी- ४५६४

६ वी- ४६७८

७ वी- ४५२५

८ वी- ४४३९

९ वी- ४३५३

१०वी- ४२५५

११वी-४२०५

१२वी-२९००

शासनाने मागील वर्षापासून जुनी पुस्तके वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे कमी असलेल्या पुस्तकांच्या संख्येची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पुस्तके आल्यावर पुस्तके मिळतील.

-आर. डी. महाजन, गटशिक्षणाधिकारी, अमळनेर