शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबादला शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST

जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद, ता. जळगाव : पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने पेरणीनंतर नुकत्याच उगवलेल्या कापसासह सोयाबीन, ...

जितेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद, ता. जळगाव : पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने पेरणीनंतर नुकत्याच उगवलेल्या कापसासह सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, मका यासारख्या खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके पिवळी पडून कीड व रोगांना बळी पडत आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या केल्या. मात्र आता अपेक्षेनुसार पाऊस पडत नसल्याने अल्प ओलाव्यावर उगवलेल्या पिकांची अवस्था नाजूक झाली आहे. पाऊस कुठे पडतो तर कुठे पडत नाही, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बियाण्याच्या उगवण शक्तीची अडचण आल्यामुळे आधीच अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. त्यात अलीकडे पावसाला अपेक्षित जोर नसल्याने दुबार पेरणीही वाया जाते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरम्यान, पावसाची वाट पाहून थकलेल्या अनेक शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्याचा वापर करून कोवळी पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी ठिबक व तुषार सिंचन प्रणालीचा वापर केला जात आहे. कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांसमोर मात्र पावसाची वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आणखी काही दिवस चांगला पाऊस न झाल्यास संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

(कोट)...

पेरणीनंतर पाहिजे तसा पाऊस झालेला नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. उगवणशक्तीवर परिणाम झाला आहे. या पिकांपासून पुढे जाऊन जास्त उत्पादनाची आशाही आता मावळली आहे.

- चंद्रकांत पाटील, ममुराबाद

फोटो- ममुराबाद भागात पेरणीनंतर चांगला दमदार पाऊस पडलेला नसल्याने वाढ थांबलेल्या पिकांवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरविण्यास सुरुवात केली आहे.