शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे गिरणा, मेहरूण तलाव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:40 IST

बेसुमार वाळू उपसा : शेतीच्या अतिक्रमणामुळे गिरणा लुप्त होण्याचा मार्गावर

जळगाव : एकीकडे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले खळाळून वाहत असताना दुसरीकडे मात्र गिरणेचे पात्र केवळ जळगाव शहराच्या प्रदुषित सांडपाण्यामुळे थोडेफार भरलेले दिसून येत आहे. शहरातील सर्व सांडपाणी गिरणेत जात आहे. गिरणेसह शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या मेहरुण तलावात देखील मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत असल्याने गिरणा व मेहरूणचे अस्तित्व धोक्यात आले आहे.शहरालगत गेलेल्या गिरणा नदीची स्थिती सध्यस्थिती बिकट झाली असून, एकेकाळी नेहमी खळाळणाºया गिरणेला गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात अपवादात्मक स्थितीत पूर आलेला असतो. त्यातच जळगाव शहराचे सर्व सांडपाणी विविध नाल्यांव्दारे गिरणेत सोडले जात असल्याने नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. जळगाव शहरासह नदीलगत असलेल्या सर्व गावांचे सांडपाणी देखील गिरणा नदीत जात आहे. प्रशासनासह पर्यावरणवादी संघटना असोत वा नदीकाठावर वसलेल्या गावांमधील ग्रामस्थ कोणालाही लुप्त होणाºया गिरणेची आर्त हाक ऐकू येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.नदीत वाळूचा ३ मीटरचा थर असणे आवश्यककोणत्याही नदीत पाणी जमीनीत शोषून घेण्यासाठी व पाण्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी नदीत ३ मीटरचा थर कायम ठेवणे गरजेचे आहे. सध्या गिरणा नदीत अनेक ठिकाणी हा थर दिसून येत नसून, पात्रात आता खडक लागायला सुरुवात झाल्याने धोक्याची पातळी गाठली आहे. तसेच नदीवर अनेक ठिकाणी बंधारे, धरणे तयार झाल्यामुळे वाळू तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबली आहे. नवी वाळू तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया खूप मोठी असते, त्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागतो.त्यामुळे सध्या परिस्थितीत होणारा वाळूचा बेसुमार उपसा रोखणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत भुवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले आहे़मेहरुण तलावातही मोठ्या प्रमाणात जलप्रदुषणशहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावातही गिरणेप्रमाणेच आजूबाजुच्या वस्तीतून मोठ्या सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे. याबाबत अनेक पर्यावरणवादी संघटना व पर्यावरण प्रेमींकडून मनपा प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी करून देखील कुठलीही कार्यवाही मनपाकडून करण्यात आलेली नाही. मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकाम होत आहे. तसेच अनेक फ्लॅटसह काही घरांचे सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे. यामुळे तलावाचे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत आहे. यासह मेहरूण तलाव परिसरात एकेकाळी मोठी वनराई व त्यामुळे विविध प्रकारच्या पशू-पक्ष्यांचा अधिवास होता. मात्र मनपाने या परिसरात होणाºया वृक्षतोडीकडे दूर्लक्ष केल्याने पर्यावरण धोक्यात आले असून येथील जैवविविधताही धोक्यात आली आहे.भूजल पातळीही खालावलीगिरणातील वाळू उपशामुळे भूजल पातळीत घट होत असून, उन्हाळ्यात गिरणा लगतच्या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. जानेवारी, फेब्रुवारीपासूनच गिरणा पट्ट्यातील शेतांमधील ट्यूबवेल्स आटल्या जातात. सावखेडा ते पळसोद पर्यंत केळीसाठी ओळखला जाणाºया भागातील केळीचे उत्पादन देखील कमी होत जात आहे.बेसुमार वाळू उपसा, नदी पात्रात अतिक्रमीत शेती- गिरणा नदीपात्रातील वाळूला इतर नद्यांचा तुलनेत बांधकामासाठी सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये वाढणाºया बांधकामासाठी गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून त्यामुळे वाळू संपत येत आहे. सावखेडा शिवारापासून बांभोरी, आव्हाणे, फुपनगरी, नांद्रा,आमोदा ते गाढोदा अशा ४० किमी च्या गिरणा पट्ट्यात दररोज बेसूमार वाळू उपसा सुरु असल्याने नदीचे अस्तित्व संपण्यासारखेच झाले आहे.-नदीपात्रात गावांलगतचा वाळू साठा कमी होत असल्याने माती लागत आहे तर काही ठिकाणी खडक, यामुळे अनेक आव्हाणे, फुपनगरी, बांभोरी, सावखेडा, गाढोदा, कानळदा भागात अनेक शेतकऱ्यांनी थेट नदीपात्रात शेती करायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढत जात आहे. मात्र, महसूल प्रशासन असो वा स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.भुयारी गटार योजनेमुळे जळगावचे सांडपाणी गिरणा नदीत जाणार नाहीजळगाव शहरातील सर्व सांडपाणी हे गिरणा नदीत जाते त्यामुळे गिरणेचे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत आहे. तसेच आसपासच्या अनेक कंपन्यांचे पाणी देखील गिरणेतच सोडले जात आहे. जळगाव शहरासाठी अमृत अंतर्गत मंजूर झालेल्या भुयारी गटारीचे काम दोन वर्षात पुर्ण झाल्यानंतर शहरातून जाणारे सर्व सांडपाणी गिरणेत जाण्यापासून रोखले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात गिरणेची काही प्रमाणात जलप्रदुषणापासून मुक्ती होवू शकते. दरम्यान, मृत्यु शय्येवर पडलेल्या गिरणेला वाचविण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव