शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडला जरी पूर्ण केली कहाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:37 IST

मी नवदुर्गा- सरलाबाई चौधरी

नाव : सरलाबाई मोतीलाल चौधरीव्यवसाय : चाळीसगाव पोस्ट कार्यालयात मेल वितरकनोंद घेण्यासारखे कार्य :पती निधनानंतर नोकरी स्वीकारलीपाच मुलींचे विवाह केले एकटीनेबसस्थानकात दरदिवशी सात तास थांबून टपाल पिशव्यांची करतात पोहचआजारावर माती करीत ओढला संसाराचा गाडाअल्प शिक्षित असूनही मुलींना शिकवलेचाळीसगाव बसस्थानकावर दरदिवशी 'तिची' लगबग सुरुच असते. बसमध्ये टपाल पिशव्यांची पोहच करण्याचे काम ती करते. दुपारी एकपर्यंत तिची धावपळ सुरुच असते. तिच्या याच धावपळीने संसाराला आधार मिळाला. पतीच्या निधनानंतर अर्ध्यावरती मोडलेला डाव तिने जिद्दीने पुढे रेटला. कष्टक-यांमधील नवदुर्गा म्हणून सरलाबाई मोतीलाल चौधरी वेगळ्या ठरतात. गेल्या १४ वर्षापासून त्या एकाकी परिस्थितीशी सामना करीत आहे. पतीच्या निधनाचा घाव पचवून त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसत पदर खोचला. पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण करीत हातही पिवळे केले. 'कुटूंबकर्ती' म्हणूनही सरलाबाई इतरांच्या मनपटलावर प्रेरणेची माळच फुलवतात.सरलाबाई यांचे पती हे चाळीसगाव पोस्ट कार्यालयात नोकरीस होते. २००६ मध्ये त्यांचे निधन झाले. भरल्या संसारात असा अंधार दाटल्यानंतर अल्पशिक्षित सरलाबाई काही काळ कोलमडल्या. तथापि पाच मुलींचे गोंडस चेहरे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरीची संधी मिळाली. २००८ मध्ये मोठ्या जिद्दीने त्या पोस्ट सेवेत रुजू झाल्या. गेल्या १४ वर्षात खचून न जाता संसाराचा गाडा ओढला. संघर्षाच्या १४ वर्षात त्यांनी पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे हातही पिवळे करुन दिले. पाचही मुली त्यांच्या सुखी संसारात रमून गेल्या आहेत.सरलाबाईंनी बेलगंगा पोस्ट कार्यालयात सेवेला सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षापासून त्या चाळीसगाव कापड गिरणी पोस्ट कार्यालयात मेल वितरक म्हणून काम करीत आहे. बसस्थानकात टपाल पिशव्यांची बसमध्ये पोहच करण्याची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली आहे. सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत त्यांची बसस्थानकात धावधाव सुरू असते. कठीण परिस्थितीत दुःखाला कवटाळत न बसता सरलाबाई संकटांना भिडल्या. आर्थिक संकटेही त्यांनी पेलली. मात्र आयुष्यावर 'शतदा प्रेम' करावे, असं म्हणत त्यांनी ही लढाई जिंकली आहे. मध्यंतरी आजारानेदेखील या दुर्गेची परीक्षा घेतली. यातही सरलाबाईंनी नेटाने आजाराला परतवून लावले. कर्म ही पूजा केली की, परमेश्वर मदतीसाठी धावून येतोच, असं मोठ्या आत्मविश्वासाने त्या सांगून जातात. त्यावेळी त्यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव उजळून निघतात.

टॅग्स :Navratriनवरात्रीChalisgaonचाळीसगाव