शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वीस दिवस उलटूनही फेरीवाल्यांना दमडीचीही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने ...

दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब

जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणा होऊन १५ दिवस उलटूनही शहरातील फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मिळालेले नाहीत. तर ही मदत वाटपाबाबत निधी मनपाने मंजूर करायचा की शासनाकडून थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, याबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना न आल्यामुळे निधी वाटपाला विलंब होत असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली.

राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गेल्या महिन्यात १५ एप्रिल रोजी राज्य शासनाने राज्यभरात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. तसेच या लॉकडाऊनची आता १५ मे पर्यंत मुदतवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांना शासनाकडून दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. या मदतीच्या घोषणेमुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पंधरा दिवस उलटूनही जळगाव शहरातील एकाही फेरीवाल्याला आर्थिक मदत करण्यात आली नसल्याचे मनपातर्फेच सांगण्यात आले. दुसरीकडे मदत न मिळाल्याने शहरातील फेरी वाल्यांकडून राज्य शासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

निधीच्या वाटपाबाबत मनपा प्रशासनात संभ्रम

राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर, त्याबाबत शासनातर्फे मनपा प्रशासनाला मदत देण्याबाबत पत्रही पाठविण्यात आले. मात्र, ही मदत देण्याबाबत लागणारा निधी मनपाने मंजूर करायचा, की थेट राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार,याबाबत कुठलीही माहिती या पत्राद्वारे कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासन या निधीच्या मंजुरीबाबत संभ्रमात आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाले या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत.

इन्फो :

फेरीवाल्यांना आर्थिक मदत करण्याबाबतची योजना ही शासनाची आहे. त्यानुसार शासनातर्फेच ही मदत दिली जाईल. शासनाकडून मदत आल्यावर ती फेरीवाल्यांना दिली जाईल.

सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव, मनपा

इन्फो :

फेरीवाल्यांमध्ये नाराजीचा सूर

शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही, फेरीवाल्यांना ही मदत अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्यामधून या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनुसार आम्ही दिलेल्या वेळेत व्यवसाय करून, नियमांचे पालन करीत आहोत. तरी देखील शासनाकडून अद्याप ही मदत न मिळाल्याने हे सरकार फक्त घोषणाबाज सरकार असल्याचा सूरही फेरीवाल्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.