शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

१४४ जागांसाठी आयटीआयची समुपदेशन फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:49 IST

जळगाव : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची दुसऱ्या समुपदेशन फेरीला सुरुवात झाली आहे. १४४ जागांसाठी ही फेरी राबविण्यात ...

जळगाव : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची दुसऱ्या समुपदेशन फेरीला सुरुवात झाली आहे. १४४ जागांसाठी ही फेरी राबविण्यात येत आहे. यासाठी बुधवारी सकाळी ७ वाजेपासून विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

शासकीय आयटीआयमधील ९१२ जागांच्या प्रवेशाठीची प्रक्रिया १ ऑगस्टपासून प्रारंभ झाली होती. ९ सप्टेंबर रोजी प्रथम फेरीला सुरुवात होऊन ती १६ सप्टेंबर रोजी संपली. मात्र, त्यानंतर मराठा आरक्षणामुळे दोन महिने ही प्रक्रिया रखडली गेली. त्यानंतर पुन्हा डिसेंबर महिन्यात या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून, ७६८ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. आता उर्वरित १४४ जागांसाठी समुपदेश फेरी राबविली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नवीन अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. हव्या त्या आयटीआय निवडचीही संधी देण्यात आली होती.

सकाळपासून विद्यार्थी ठाण मांडून

नुकतीच समुपदेश फेरीची यादी जाहीर झाले आहे. त्यामुळे ३६४ विद्यार्थ्यांचे नावे आहेत. या विद्यार्थ्यांना बुधवारी १ ते १००, १०१ ते २०० तसेच २०० ते ३०० व ३०० ते ३६४ या क्रमाने आयटीआयत प्रवेशासाठी बोलविण्यात येत होते. ही समुपदेश फेरी १४४ जागांसाठी राबविली जात आहे. ३६४ विद्यार्थ्यांमधून १४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आपला क्रमांक लागावा म्हणून सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गर्दी केली होती.