शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या आगारात संशोधन केंद्र उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:31 IST

कर्मचाऱ्यांची वाणवा, खते, किटकनाशके यावरही होते संशोधन

जळगाव : १९९१ पासून जळगावातील निमखेडी शिवारात सुरू असलेल्या केळी संशोधन केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रयोगशाळेची मागणी प्रलंबितच असून हे संशोधन केंद्र वर्षानुवर्षे केवळ लागवड व काढणीपर्यंतच्या संशोधनापर्यंतच मर्यादीत राहिले आहे़ या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीही वाणवा असून केळीच्या आगारातच हे संशोधन केंद्र दुर्लक्षित असल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळणार कसा ? हा प्रश्न उपस्थित होत आहे़
महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत हे केळी संशोधन केंद्र अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ या ठिकाणी पाच एकरावर केळीसंदर्भातील वाणांवर संशोधन केले जाते़ ९३ वाणांचे या ठिकाणी संकलन करण्यात आले आहे़ यासह खते, किटनाशके यांच्याबाबतीतही संशोधन होते़ यातून शेतकºयांना कसा फायदा होईल, आर्थिक दृष्ट्या शेतकरी कसा मजबूत होईल, याबाबत नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयोग केले जातात. तसेच रोगांवरील उपाय याबाबत प्रयोगद्वारे माहिती संकलीत केली जाते़
साठ वर्षांपासून जिल्ह्यातच केंद्र
महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले हे केळी संशोधन केंद्र अनेक ठिकाणाहून स्थलांतरीत होऊन सन १९६१ मध्ये सावदा त्यानंतर सन १९६९ मध्ये यावल व सन १९९१ पासून जळगावात स्थित आहे़ राज्यभरातील केळी लागवडीपैकी जळगावातच ६० ते ७० टक्के लागवड होत असल्याने या ठिकाणीच हे केंद्र आहे़
अचानक कमी केले कर्मचारी...उद्यान विद्यावेत्ता प्रा़ एऩ बी़ शेख, कनिष्ठ मृदरसायन शास्त्रज्ञ प्रा़ ए़ आऱ मेढे, कनिष्ठ वनस्पती रोग निदान शास्त्रज्ञ यांच्यासह आऱ आऱ डोभाळ, एम़ आऱ देशमुख, व्ही़ एस़ लंगाटे हे कर्मचारी सध्या या संशोधन केंद्रात कार्यरत आहेत़ २०१४च्या आधी या केंद्रात पुरेसे मनुष्यबळ होते मात्र, अचानक एके दिवशी ई-मेल वर पत्र येऊन येथील कर्मचाºयांना अन्य विभागांमध्ये हलविण्यात आले़ तेव्हापासून या ठिकाणी पाच ते सहाच कर्मचारी कार्यरत आहेत़
केळीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियांचे संशोधन या केंद्राद्वारे होते़ कुठलेही संशोधन केल्यावर निष्कर्षापर्यंत पोहचत असताना शेतकºयांना आर्थिक फायदा कसा होईल, याचाच विचार अधिक केला जातो़ आदिवासी शेतकºयांना प्रोत्साहन म्हणून नंदुरबार जिल्ह्यात योजनाही राबविल्या जात आहे़ केळीवर प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे़
-प्रा़ एऩ बी़ शेख, उद्यान विद्यावेत्ता.

टॅग्स :Jalgaonजळगाव