शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर जिल्हा बँकेसाठीच्या हालचाली पुन्हा मंदावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

भाजपची सर्वपक्षीय तोडग्यासह स्वबळाचीही तयारी : ‘त्या’ सहा जागांचा तिढा कायम राहण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा ...

भाजपची सर्वपक्षीय तोडग्यासह स्वबळाचीही तयारी : ‘त्या’ सहा जागांचा तिढा कायम राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा बँकेसाठी मतदार यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, २५ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याआधी जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यासाठी बैठक ही पार पडली व जागावाटपासाठी सर्वपक्षीय नेत्यांची समितीदेखील तयार झाली आहे. मात्र, समिती तयार झाल्यानंतर जिल्हा बँकेसाठीच्या हालचाली पुन्हा मंदावल्या असून, भाजपकडून यासाठी प्रतिसाद दिला जात नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पहिल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांच्या ८ सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी गठित करण्यात आली होती. कमिटीत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व ॲड. संदीप पाटील यांचा समावेश आहे. मात्र, समिती स्थापन झाल्यापासून समिती सदस्यांची आतापर्यंत एकही बैठक झालेली नाही.

खडसे राजस्थानहून आल्यावर बैठक

माजी मंत्री एकनाथ खडसे हे उपचारासाठी राजस्थानला गेले असल्यामुळे ही बैठक रखडल्याचे कारण पुढे केले जात आहे. खडसे हे राजस्थानला गेले असल्याने समिती सदस्यांची बैठक होऊ शकली नव्हती. मात्र, आठवडाभरात सर्वपक्षीय समिती सदस्यांची बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याठिकाणची पाहणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसानीचा आढावा घेणे या कामांना अधिक प्राधान्य देणे गरजेचे होते. त्यामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

६ जागांमुळे डोकेदुखी वाढणार

जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघाव्यतिरिक्त असलेल्या इतर सहा मतदारसंघातील जागांवरून सर्वपक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या सहा जागांमध्ये २ महिला, १ ओबीसी, १ एनटी, १ एसटी व १ इतर सहकारी संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. सोसायटी मतदार संघातील १५ जागांवर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले तरी सहा जागांबाबत होणे कठीण असल्याने या ६ जागांवरून सर्वपक्षीय पॅनल फिस्कटण्याचीही शक्यता आहे. सद्य:स्थितीत ६ जागांपैकी ३ जागा भाजप, २ राष्ट्रवादी, तर १ शिवसेनेकडे आहे. अशा परिस्थितीत समान वाटपाचा निर्णय झाल्यास भाजपला एक जागा सेनेसाठी सोडावी लागणार आहे. मात्र, भाजप गेल्यावेळेप्रमाणेच तीन जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.