शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरुस्तीच्या कामांचा वेग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, मनपाकडून रस्ते दुरुस्ती तरी करण्यात यावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, मनपाकडून रस्ते दुरुस्ती तरी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांचा वाढत जाणारा रोष पाहता शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले होते. मात्र, कामांची गती नसल्याने पुन्हा ठेकेदार व मनपा अभियंत्यांची बैठक घेऊन शहरातील दुरुस्तीच्या कामांच वेग वाढविण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

महापौरांच्या दालनात गुरुवारी मनपा अभियंता, अधिकारी व ठेकेदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन संकत, शहर अभियंता अरविंद भोसले, विलास सोनवणे,नरेंद्र जावळे, मनीष अमृतकर, प्रकाश पाटील, संजय पाटील, जितेंद्र रंधे, गोपाळ लुळे, योगेश वाणी आदी उपस्थित होते. या बैठकीत शहरात सुरू असणारी डागडुजीची तसेच अन्य कामांबाबत आढावा घेण्यात आला. यात मक्तेदारांनी काही समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने बिल संबंधित थर्ड पार्टी तपासणी रिपोर्ट, कामांना देण्यात येणारा अग्रक्रम या समस्या मांडण्यात आल्या. या समस्यांवर मात करून त्यांनी कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश महापौर आणि उपमहापौरांनी दिले. दरम्यान, शहरातील अनेक भागात मुरूम व खडीच्या सहाय्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून, या कामांची गुणवत्तादेखील तपासण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या आहेत.