शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

५३ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:27 IST

पाण्याअभावी ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीही धोक्यात आली आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यासाठी वरदान ठरलेला निम्न दुधना प्रकल्प पावसाअभावी कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. प्रकल्पात अल्पसा पाणीसाठा असून, परतूर, सेलू, मंठा शहरासह ग्रामीण भागातील पाणी प्रश्न बिकट बनला आहे, तर पाण्याअभावी या प्रकल्पावर आधारित असलेल्या ५३ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीही धोक्यात आली आहे.मागील वर्षी तालुक्यात आजपर्यंत ४७२. ६० मी.मी. पाऊस झाला होता. तर यंदा आजवर केवळ २७१. ८९ मी.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच केवळ ३७.७६ टक्के पाऊस अद्याप झालेला आहे. हा पाऊस ही भिज पावसाप्रमाणे झाला. त्यामुळे नदी, नाले, तलाव, धरण यांसह इतर जलस्त्रोत कोरडे ठाक आहेत.तालुक्यासह परिसराला वरदान ठरलेला निम्न दुधना प्रकल्पही कोरडाच आहे. यंदा एकही थेंब या धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली नाही. उलट उपलब्ध असलेला मृत साठा दिवसेंदिवस घटत आहे. या धरणात असलेले पाणी उन्हाळ््यामध्ये परभणीसाठी सोडण्यात आले होते. यामुळे धरण रिकामे झाले. सद्यस्थितीत धरणात जिवंत पाणी साठा उणे -१९. ७१ दलघमी असून मृतसाठा ५४.५४६ दलघमी आहे. या धरणाच्या पाण्यावर जवळपास ५५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. हे सिंचन क्षेत्रही आता धरणात पाणी नसल्याने अडचणीत आले आहे. याबरोबरच या धरणाच्या पाण्यावर परतूर, सेलू, मंठा, डासाळासह इतर गावच्या पाणी पुरवठा योजना सध्या पाण्यासाठी झुंज देत आहेत. धरणाची पाणी पातळी घटल्याने बॅक वॉटरही खाली गेले आहे. यामुळे पाणी पुरवठा योजना पंप, पाईप टाकून पाणी ओढत आहेत. पाणीही गाळ युक्त असल्याने नागरीकांना मिळणारे पाणी अस्वच्छ मिळत आहे. धरणातील हा मृत साठा किती दिवस पुरणार ? हा प्रश्न आहे. बॅक वॉटर खाली गेल्याने दुधना नदीचे पात्र कोरडे पडले आहे. दरवर्षी या दिवसात बॅक वॉटरने डबडबलेल्या दुधना नदीच्या पात्रात यंदा मात्र गवत उगवले आहे.४निम्न दुधनाच्या बॅक वॉटर वर परतूर तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुधनावरून पाईपलाईन करून सिंचनाची सोय केली. मात्र, यंदा दुधना नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणagricultureशेतीwater shortageपाणीकपात