शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम, त्याग आणि सदाचाराची शिकवन भागवत कथेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

देळेगव्हाण : श्रीमद् भागवत कथा ही अद्भूत असून, ही कथा श्रीकृष्णाची शब्दमूर्ती आहे. ही पवित्र भागवत कथा श्रवण करण्याची ...

देळेगव्हाण : श्रीमद् भागवत कथा ही अद्भूत असून, ही कथा श्रीकृष्णाची शब्दमूर्ती आहे. ही पवित्र भागवत कथा श्रवण करण्याची केवळ इच्छा होणे हे परमभाग्य आहे. ही कथा प्रेम त्याग आणि सदाचाराची शिकवण देते, त्यामुळे या कथेचे सातत्याने श्रवण करून आत्मचिंतन करतांनाच तशी कृती प्रत्येकाने आपल्या जीवनात करणे गरजेचे असून, भागवत ग्रंथ हे जीवन जगण्याचे मूलतंत्र असल्याचे मत भागवताचार्य हभप. विष्णू देशमुख यांनी केले.

देळेगव्हाण येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाची रूपरेषा बदलून अगदी छोट्या खाणी कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात भागवताचार्य हभप. विष्णू देशमुख कनक सागज आश्रम वैजापूरकर यांच्या वाणीतून रात्री ८ ते १० दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात येत आहे. भागवत कथेतून सदाचारी जीवनाची शिकवण मिळते. सदाचारी बनायचे असेल तर भगवंताच्या भक्ताची संगत करा, त्यातून जीवनात आमूलाग्र बदल होईल, जशी संगत तशी माणसाची घडण होत असते. त्यामुळे नेहमी संगत साधू संतांची करा, असा संदेश त्यांनी दिला.

चौकट

श्रीकृष्ण यांच्या भक्ताचे चरित्र वाचून ते आत्मसात करा, असे आवाहनही त्यांनी या वेळेस केले. संत हे राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे. केवळ माणसातील अंहकारामुळे आपण संतांना ओळखू शकत नाही. या भागवत कथेत संपूर्ण जीवनाचे सार आहे. म्हणून ही कथा श्रावण करून आत्मसात करा, असा संदेशही देशमुख महाराजांनी दिला.