शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सात नगरसेवकांची मतदानाला दांडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:31 IST

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी सोमवारी जालना जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयात मतदान पार पडले. एकूण २७२ पैकी २६५ जणांनी मतदानाचा हक्क बजावाला.

ठळक मुद्देशिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा : सात ठिकाणी शंभर टक्के मतदान

जालना : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी सोमवारी जालना जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयात मतदान पार पडले. एकूण २७२ पैकी २६५ जणांनी मतदानाचा हक्क बजावाला. जालन्यातील काँग्रेसच्या सहा तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने मतदानाला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शिवसेनेने या सर्वााना गळाला लावल्याची चर्चा दिवसभर शहरात होती.जालना येथील तहसील कार्यालयात हे मतदान पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, प्रभारी तहसीलदार गणेश पोलास यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती. दुपारी बारावाजेनंतर मतदान केंद्रावर काँग्रेस तसेच शिवसेना,भाजपचे नगरसेवक पोहचले होते. शिवसेनेचे नगरसेवक एका खासगी गाडीतून प्रथम जि.प. अध्यक्षांच्या शासकीय निवास्थानी एकत्रित आले होते. यावेळी जि.प.चे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, नगरसेवक विष्णू पाचफुले, संजय खोतकर हे सोबत होते. तर भाजपकडून उपाध्यक्ष भास्कर दानवे, गटनेते अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती.काँग्रेसचे नगरसेवक हे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या समवेत मतदानासाठी आले होते. यावेळी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना घोषणा देण्यापासून थांबवले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.प्रारंभी काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवकांना एकत्रित बोलावण्यात आले होते. परंतू सहा नगरसेवकांचा मोबाईल रेंज बाहेर असल्याने काँग्रेसच्या मनात तेथेच पाल चुकचूकली.यावेळी शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत आदींची उपस्थिती होती.निवडणूक : काँग्रेसचे सहा, राकॉचा एक नगरसेवक गैरहजरजालना शहरातील मालनबाई दाभाडे, सुमनबाई हिवाळे, हरिष देवावाले, मिनाबाई काबलिये, प्रिती कोताकोंडा, मोहमंद नजीब या सहा काँग्रेसच्या तर फारूक तुंडीवाले हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. या सात जणांनी मतदान न केल्याने त्यांना शिवसेनेने गळाला लावल्याची चर्चा होती. परंतु या सातही जणांशी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केलापरंतु त्यांचा मोबाईल रेंज बाहेर असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी चार वाजेपर्यंत या नगरसेवकांशी संपर्क साधल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. दरम्यान पक्षाचा व्हीप डावलणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :JalanaजालनाElectionनिवडणूक