शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जनता-जनार्दन हेच माझे दैवत- रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:08 IST

पक्षभेदासह सुडाचे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी खेचून आणू, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आपण निवडून येण्यामागे कुठल्या गुरू अथवा देवाची साथ आहे, असे नसून, आपण कायम जनतेत राहून त्यांच्या सुख - दु:खाशी समरस होतो, त्यामुळेच आपण विजयी होत आलो आहोत. जनतेचे हे उपकार आपण कधीही विसरणार नाही. निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार होतो, परंतु आता मी देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहे. त्यामुळे मी पक्षभेदासह सुडाचे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी खेचून आणू, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
दानवेंच्या शनिवारी सर्वपक्षीय सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. विलास खरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, जालना पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, नगरसेवक भास्कर दानवे, सुधाकर जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, ज्यावेळी भाजपचे केवळ दोन खासदार होते, त्यावेळी तत्कालीन खा. दिवंगत बाळासाहेब पवार यांनी आपल्याला काँग्रेसमध्ये येण्याची गळ घातली. तुमच्या पक्षाचे दोनच खासदार आहेत, त्यामुळे तेथे भविष्य नाही असे त्यांनी समजावून सांगितले. परंतु आपण पक्षनिष्ठा कायम ठेवल्यानेच आज येथपर्यंत पोहोचलो आहोत. यंदाच्या निवडणुकीत तर ऐन प्रचाराच्यावेळी आपण १२ दिवस आजारी असल्याने रूग्णालयात होतो. परंतु तरीही पक्षबांधणीची ताकद आणि मतदारांवरील विश्वासामुळेच आपला एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय झाला. या विजयाची खात्री आपल्याला होती, असेही दानवे म्हणाले.
दरम्यान आगामी काळात पूर्वीप्रमाणेच जालन्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी आपण बांधील आहोत.
सुडाचे राजकारण न करता, आपण सर्व पक्षांचे म्हणणे जिल्ह्याच्या विकासासाठी ऐकून तसे काम करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून सहा हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगून आयसीटी, ड्रायपोर्ट, डीमआयसी, समृध्द महामार्ग जालना ते वडीगोद्री हा ३४० कोटींचा रस्ता तयार केला. अशी अनेक उदाहरणे देता येतील असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी दानवेंच्या मंत्रिमंडळ समावेशाने जालन्याला देशाच्या सत्तेत वाटा मिळाला आहे. त्यामुळे मराठवाड्याचा अनुशेष दूर होऊन जालना जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागण्यास दानवेंची मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश भोसले आणि संजय देठे यांनी केले. आभार देविदास देशमुख यांनी मानले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
खोतकरांसोबतचा वाद हे नाटक
मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या विरोधात राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी शड्डू ठोकून मोठे आव्हान उभे केले होते. परंतु खोतकरांनी निवडणूक लढवू नये म्हणून त्यांच्यात आणि माझ्यात दोन महिन्यांपूर्वीच समेट झाला होता. नंतर जे काही झाले, ते एक नाटक होते, असे सांगून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा झटका दिल्याने सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेPoliticsराजकारणSocialसामाजिक