शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

खाजगी बस उलटून एक ठार, १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:52 AM

नागपूरहून २४ प्रवासी घेऊन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक ट्रॅव्हल्स बस जालना शहराजवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ उलटली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूरहून २४ प्रवासी घेऊन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक ट्रॅव्हल्स बस जालना शहराजवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ उलटली. विशेष म्हणजे, या बसने तीन झाडांना धडक देत दोन पलट्या खाल्याने ही बस रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड््यात पडली. हा अपघात गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात एक महिला ठार तर, अन्य १५ प्रवासी जखमी झाले आहेत. सुरेखा जयंत खडतकर ( ४६, रा. हडपसर, पुणे ) असे मयत महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरवरून पुण्याकडे २४ प्रवाशांना घेऊन एक ट्रॅव्हल्स (क्रं. एमएच.१४.जीयु. ४३९८) ही बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता निघाली होती. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जालना शहरालगतच्या बायपास रोडने जात होती. यावेळी वन विभागाच्या कार्यालय जवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस तीन झाडांना धडकली. दोन पलट्या खात बस रस्त्याच्या बाजूला पडली. दरम्यान, बसला टेलिफोनचे केबल अडकल्याने बस थांबली असल्याची माहिती प्रवासी नंदकिशोर ठाकूर यांनी दिली.यात प्रवासी सुरेखा जयंत खडतकर यांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश शहाद मुंजाल, मलकियतसिंग मनिंदरसिंग, बाबूराव अंतराम एखंडे, मंजुळा बाबूराव एखंडे, अमित गोपालराव शहा, सतीश ओमप्रकाश बजाज, रूची संतोष बजाज, नंदिनी चंद्रकांत तळवतकर, मुस्तफा शब्बीर बोहरा, नंदकिशोर दादारावजी ठाकरे, अशिका नंदकिशोर ठाकरे, सुरभि शरद बोस, श्रेया संजय चोपकर, स्नेहल अनिल सियाले, गजानन भागवत शिंदे हे प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गाडी चालक महिंद्र दौलतराव सावरकर (३३, रा. अमरावती ) याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, बस ही ६० ते ६५ च्या स्पीडने होती. परंतु, वळण रस्ता अचानक आल्याने मी बसचे ब्रेक लावले.परंतु, बसचे ब्रेक न लागल्यामुळे माझे नियंत्रण सुटल्याचे बसचालक महिंद्र सावरकर यांनी सांगितले.‘त्या’ तिघांनीच जखमींना काढले बाहेर : दिशादर्शक फलकच नाहीबसमधील नंदकिशोर ठाकूर (रा. नागपूर) मुस्ताफा बोहरा (वर्धा) आणि मुलकेत सिंग (जुम्म) या तिघांनी बसच्या खडकीची काच फोडून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर प्रवाशांना रुग्णवाहिकेने शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात नेण्या येऊन उपचार करण्यात आले.सिंदखेडराजा चौफुली ते देऊळगावराजा चौफुली दरम्यान वन विभागाच्या कार्यालयाजवळ मोठे वळण आहे. येथून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. परंतु, या वळणावर दिशादर्शक फलकच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहनधारकांना वळण आलेलेच समजत नाही.या रस्त्यावरुन दररोज वेगाने वाहने धावतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे व वळण असल्याने वाहन चालकांना समोरुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होतात. आठ दिवसांपूर्वीच जनावरे घेऊन जाणारे एक ट्रक या ठिकाणी उलटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकूणच हा रस्ता अपघताचे स्थळ झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वळण रस्त्यावर कुठेच गतीरोधक नसल्याने देखील अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू