शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

...तर माझं नाव बदलून टाका; शहबाज शरीफ यांनी केली पाकिस्तान-भारताची तुलना, वास्तव काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:32 IST

पाकिस्तानात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात बेरोजगारी दर २२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता.

नवी दिल्ली - जर पाकिस्तानने विकासाच्या बाबतीत भारताला मागे सोडलं नाही तर माझं नाव बदलेन असा दावा पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे. देशातील जनतेला खुश करण्यासाठी कदाचित शहबाज यांनी हे विधान केले असावे परंतु वास्तव पाहिले तर हे चित्र फार दूर आहे. भारताला मागे टाकण्याचा चंग बांधणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी आधी त्यांच्या देशातील स्थितीवर लक्ष द्यायला हवं असा शहबाज शरीफ यांचं विधान ऐकून प्रत्येकजण बोलत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या विकासात काय फरक?

पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत परंतु त्यांच्या अर्थव्यवस्था आणि विकासात मोठी तफावत असल्याचं दिसून येते. २०२४ ची पाकिस्तानी जीडीपी सांगायचं झाल्यास १.६५९ ट्रिलियन डॉलर आहे. या वर्षी २०२५ मध्ये ती १.७३६ ट्रिलियनपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये वर्ल्ड इकोनॉमी आऊटलूकमध्ये हे आकडे दिलेत. दुसरीकडे भारताचा जीडीपी २०२४ मध्ये १४.५९४ ट्रिलियन डॉलर आहे. २०२५ मध्ये जीडीपी दर १५.५४१ ट्रिलियनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर सामान्य जीडीपी पाहिला तर भारत ४.१३६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर तर पाकिस्तान ०.३४१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या १२ पट अधिक आहे.

पाकिस्तानात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात बेरोजगारी दर २२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता. १५ ते २४ वर्षातील युवकांची बेरोजगारी २९ टक्के इतकी आहे. १६ मिलियनपेक्षा अधिक युवक ना नोकरी करतात ना कुठलेही शिक्षण घेत आहेत अशा युवकांची संख्या येणाऱ्या काळात २२ मिलियनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. महिलांची स्थिती आणखी बिकट आहे. याठिकाणी महिलांच्या बेरोजगारीचा दर ३९ टक्के आहे. ज्या महिला काम शोधतात त्यांना नोकरी मिळणे कठीण आहे. 

दरम्यान, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतात ५८६ मिलियन लोक काम करतात. याठिकाणी जगातील सर्वात मोठी कामगार शक्ती आहे. भारताने बराच विकास साधला आहे. परंतु याठिकाणी समस्या आहेत. भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यात दरी आहे. इथं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहतात पण गरीबीची तितकीच आहे. परंतु भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाकिस्तानची अवस्था सध्या खूप बिकट आहे. बेरोजगारी आणि शिक्षण याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे भारताला मागे टाकणं पाकिस्तानसाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत