शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानविरोधात लढाई, भारताकडे मागितली मदत; कोण आहेत निर्वासित बलूचिस्तानच्या पंतप्रधान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:58 IST

नायला या सातत्याने भारत दौरा करतात. २०१६ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. हे तेच वर्ष होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानचा मुद्दा १५ ऑगस्टच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात उचलला होता.

बलूच लिबरेशन आर्मीने अलीकडच्या काळात पाकिस्तानवर आक्रमक हल्ले सुरूच ठेवले आहेत. ट्रेन हायजॅकपासून स्फोटापर्यंत बलूचिस्ताननं पाकिस्तानची डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच दीर्घ काळापासून बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारी नायला कादरी बलोच यांनी पाकिस्तानला फटकारलं आहे. बलूचिस्तान हा कधीकाळी स्वतंत्र देश होता, त्यावर आता पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे असा तिने दावा करत बलोच लोकांविरोधात मानवाधिकार उल्लंघन, संसाधनाची लूट आणि हत्येचा आरोप पाकिस्तान सरकारवर करत आहे.

स्वतंत्र बलूचिस्तानचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. नायला कादरी बलोच यांनी निर्वासित बलोच सरकारची स्थापना केली आहे. त्या स्वत: बलोच सरकारच्या पंतप्रधान आहेत, ज्याची स्थापना २१ मार्च २०२२ रोजी युरोपात केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे ठिकाण सार्वजनिक केले नाही. त्या सध्या कॅनडात राहत असल्याचं सांगितले जाते. नायला बलूचिस्तानच्या स्वातंत्र्येसाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळावं यासाठी अनेक देशांचा दौरा करतात. त्यांनी विशेषत: भारताकडे मदतीचं आवाहन केले आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात बलूचिस्तानचा मुद्दा उचलून धरण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नायला यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार यांच्याकडे यूएनमध्ये बलूचिस्तानच्या समर्थनात उभं राहण्याची संधी आहे. जी कदाचित उद्या नसेल. नरेंद्र मोदींना बलूचिस्तानातील लोक नायक म्हणून पाहतात. जर भारताने UN मध्ये बलूचिस्तानचं समर्थन केले तर स्वतंत्र बलूचिस्तान भविष्यात भारताचं समर्थन करेल. भारत आणि बलूचिस्तान यांच्यात खूप साम्य आहे. या दोन्ही देशांना धर्माच्या नावावर अन्याय केला गेला असंही त्यांनी सांगितले. परंतु भारत सरकारने अद्याप बलूचिस्तान निर्वासित सरकारला मान्यता दिली नाही.

नायला या सातत्याने भारत दौरा करतात. २०१६ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. हे तेच वर्ष होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानचा मुद्दा १५ ऑगस्टच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात उचलला होता. त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्येही नायला भारतात आल्या होत्या. बलूचिस्तानमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे.  पाकिस्तानी सैन्य बलूच लोकांच्या घराला आग लावत आहे. आमच्या बागा, शेती पेटवत आहे असं नायला यांनी भारतात आल्यावर म्हटलं होते. 

कोण आहेत नायला कादरी बलोच?

नायला कादरी बलोच यांचा जन्म १८ जुलै १९६५ साली पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात झाला होता. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजात महिलांची स्थिती आणि अधिकारांबाबत संघर्ष केला. कबीलाई संस्कृती असणाऱ्या बलूचिस्तानात महिलांच्या हक्काकडे कायम दुर्लक्ष केले जाते. बलूचिस्तानची संस्कृती, भाषा यांना नायला यांनी प्राधान्य दिले आहे. बलूच समुदायाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख कायम सुरक्षित राहावी यासाठी नायला संघर्ष करत आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत