शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:47 IST

बांगलादेशमध्ये जेट विमान एका शाळेवरती क्रॅश झाले होते. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते.

बांगलादेशमध्ये हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान सोमवारी एका शाळेवरती कोसळले. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला. हे विमान ज्या शाळेवरती पडले त्या शाळेतील २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ढाकामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी भारतातून डॉक्टरांचे एक पथक जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

बर्न स्पेशालिस्ट डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक दिल्लीहून ढाक्याला जात आहे. अशा रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणारी आवश्यक वैद्यकीय उपकरणेही भारत पाठवत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.

पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

या विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला मदतीचे आश्वासन दिले. सोमवारी २१ जुलै रोजी दुपारी १.०६ वाजता हवाई दलाच्या एफ-७ बीजीआय प्रशिक्षण विमानाने उड्डाण केले. दुपारी १.३० वाजता हे विमान ढाका येथील उत्तरा येथील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीवर पडले. या भीषण अपघातानंतर शाळेच्या इमारतीला आग लागली.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. "भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय मदतीसह बर्न तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक ढाक्याला जात आहे", असं म्हटले आहे. गरज पडल्यास अशा रुग्णांना उपचारांसाठी भारतातही आणता येईल, असंही यामध्ये म्हटले आहे.

एका निवेदनात म्हटले आहे की, "ते रुग्णांच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन गरजेनुसार भारतात पुढील उपचार आणि विशेष काळजी घेण्याची शिफारस करतील. तिकडे गरजेनुसार वैद्यकीय पथके देखील पाठवता येतील. बांगलादेशला पाठवल्या जाणाऱ्या पथकात दिल्लीचे दोन डॉक्टर आहेत. त्यापैकी एक राम मनोहर लोहिया रुग्णालयातील आहे आणि दुसरा सफदरजंग रुग्णालयातील आहे. याशिवाय, बर्न विभागाच्या तज्ज्ञ परिचारिका देखील ढाक्याला जात आहेत.

उच्चस्तरीय समिती तपास करणार

बांगलादेश हवाई दलाने अपघाताची कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सोमवारी झालेल्या या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. या संकटात भारत बांगलादेशसोबत उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतairplaneविमानPlane Crashविमान दुर्घटना