शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'हे' असू शकतं मुलांचं चिडचिड करण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 15:37 IST

कोणत्याही पालकांसाठी आपल्या लहान मुलांचा राग शांत करणं सोपं काम नाहीये. खासकरुन जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असता तेव्हा मुलांना शांत करण्याचे पर्याय नसतात.

कोणत्याही पालकांसाठी आपल्या लहान मुलांचा राग शांत करणं सोपं काम नाहीये. खासकरुन जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असता तेव्हा मुलांना शांत करण्याचे पर्याय नसतात. अशावेळी अनेक पालक हे आपल्या मुलांवर चिडतात. पण अशाप्रकारे चिडून मुलं शांत होत नाहीत. उलट ते आणखी जास्त आरडाओरड करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, मुलं असं का करतात? खरं तर चिडचिड करण्याची अनेक कारण असू शकतात.

तुमची मुलं सतत चिडचिड करतात का? किंवा ती सतत आक्रमक होत असतील तर यामागील सर्वात मोठं कारण साखर असू शकते. गोंधळलात का? जास्त प्रमाणात साखरेचं सेवन केल्यामुळे तुमचं मुल आक्रमक आणि रागीट होऊ शकतं. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. संशोधनात सांगितल्यानुसार, ज्या मुलांच्या आहारात साखरेचं प्रमाण अधिक असतं किंवा जी मुलं सर्वात जास्त साखर खातात, ती अधिक हिंसक, अल्कोहॉलिक आणि सिगरेट पिण्यास जास्त प्रवृत्त होतात. हे संशोधन जर्नल सोशल सायन्स अॅन्ड मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.  अनेक संशोधनांचे विश्लेषण केल्यानंतर असं समोर आलं की, जास्त साखर खाल्याने किंवा साखरेचं प्रमाण जास्त असलेलं पेय प्यायल्याने 11 ते 15 वर्षांच्या मुलांमध्ये हिंसकवृती वाढते. संशोधनानुसार, जर एखादं मुल जास्त मिठाई किंवा एनर्जी ड्रिंक घेत असेल तर त्याचं असं करणं दुसऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतं. तेच दुसऱ्या एका संशोधनातून सांगितले की, लहान मुलांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांची भांडणामध्ये पडण्याची शक्यता वाढवतं. त्यामुळे 95 टक्के मुलं नशेच्या आहारी जातात. 

संशोधकांचं असं म्हणणं आहे की, एनर्जी ड्रिंक, चॉकलेट आणि मिठाईचे अधिक सेवन केल्यामुळे मुलांच्या वागण्यावर वाईट परिणाम होतो. कारण यामध्ये कॅफेन अधिक असतं. इस्रायलमधील बार इलन युनिवर्सिटीने 137,284 मुलांवर अभ्यास केला. ज्यामध्ये 11, 13 किंवा 15 वर्षांच्या मुलांचा समावेश केला होता. यामध्ये असं आढळून आलं की, मुलांच्या वागण्याचा त्यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाशी घनिष्ट संबंध आहे. 

नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लडच्या गाइडलाइन्सनुसार, 11 वर्षांची मुलं 30 ग्रामपेक्षा जास्त साखर खात नाहीत. कोकाकोलाच्या एका कॅनमध्ये 35 ग्रॅम साखर असते. 4 ते 6 वर्षांच्या मुलांना दिवसभरासाठी 19 ग्राम साखर देणं शक्यतो टाळावं. 

संशोधकांनी सांगितले की, मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे त्यांना मोठे झाल्यावर कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो याचा अंदाज येतो. अभ्यासानुसार, अधिकाधिक प्रकरणांमध्ये मुलांच्या आहारातील साखरेचे प्रमाण आणि त्यांचं वागणं यामध्ये त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या वागण्याचा फरक पडत नाही. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारrelationshipरिलेशनशिपParenting Tipsपालकत्व