समोर आली भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची कारणं; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:52 PM2021-05-06T13:52:23+5:302021-05-06T14:04:56+5:30

Coronavirus third wave : विजयराघवन यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सांगितले. 

Coronavirus third wave enevitable top scientific advisor k vijayraghavan says we need to be prepared | समोर आली भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची कारणं; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांचा दावा

समोर आली भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची कारणं; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांचा दावा

Next

कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटेशी भारत सामना करत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच  गंभीर होत चालली आहे.  रुग्णालयात  बेड्स खाली नाहीत, ऑक्सिजन मिळत नाहीये. संक्रमणामुळे रोज हजारो लोकांना मृत्यूचा सामना करावा लाागत आहे.  या सगळ्यात वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. अशात  केंद्र सरकारने याबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लाहार के. विजयराघवन यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सांगितले. 

के. विजय राघवन म्हणाले की, ''कोरोना महामारीची तिसरी लाट देशात कधी येईल आणि ते कोणत्या पातळीवर येईल अर्थात ते किती धोकादायक असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयार असले पाहिजे,'' असा इशारा त्यांनी दिला.

काय असू शकतात कारणं?

के. विजयराघवन म्हणाले की, ''ज्या प्रकारे देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्या दृष्टीने तिसरी लहर येईल असे म्हणता येईल. ते म्हणाले की कोरोनाच्या पहिल्या लहरीमध्ये विषाणूचे इतके रूपे नव्हते जितके दुसर्‍या लाटेमध्ये आहे, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कोरोनाचे नवीन रूप तीन  लाटांसाठी कारणीभूत ठरू शकतात. ते म्हणाले की विषाणूचे रूप बदलणे दुसऱ्या लाटेमागील एक मोठे कारण आहे.'' 

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

पुढे त्यांनी सांगितले की, ''कोरोनाच्या पहिल्या लाटेत रोगप्रतिकारक शक्तीमुळे हा संसर्ग बर्‍याच प्रमाणात कमी झाला होता, परंतु आता लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. या कारणामुळे पूर्वी ज्यांना संसर्ग झाला होता त्यांना पुन्हा संक्रमण होत आहे. कमी प्रतिकारशक्ती आणि लोकांच्या सावधगिरीचा अभाव ही दुसरी लाट येण्याचे कारण आहे. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की जर लोक अजूनही काळजी घेत नाहीत आणि निष्काळजीपणा करत राहिले तर तिसरी लाट येऊ शकते.'' भारत आणि जगभरातील शास्त्रज्ञ अशा प्रकारची २ रूपं अगोदरच ओळखण्यासाठी आणि त्यांच्याविरूद्ध प्रभावी साधने विकसित करण्यासाठी सतत कार्यरत आहेत.

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

कोरोनाच्या लाटांना रोखण्यासाठी कोणता उपाय आहे?

एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी या प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की, ''संसर्गाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणखी काही गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या विषयांवर चर्चा होत आहे.  यापूर्वीच राज्यांना कडक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून संक्रमणाची साखळी खंडित होऊ शकेल.''

Web Title: Coronavirus third wave enevitable top scientific advisor k vijayraghavan says we need to be prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.