शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

रेकीमुळे खरंच वजन कमी करता येतं का? जाणून घ्या याचे फायदे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 11:11 IST

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का?

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का? असा प्रश्न विचारला जात आहे. रेकी ही एक जपानी नैसर्गिक चिकित्सा आहे. यात विधीमध्ये जीवन शक्ती आणि प्राण शक्तीच्या माध्यमातून उपचार केले जातात. म्हणजे व्यक्तीमध्ये एक आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करण्याची ही पद्धत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपचाराने एक नाही तर वेगवेगळे आजार बरे केले जातात असा दावा केला जातो. 

(Image Credit : medicalnewstoday.com)

या उपचार पद्धतीत व्यक्तीमधील शक्तीचाच त्याच्या समस्येच्या उपचारासाठी वापर केला जातो. रेकी उपचारात तळहातांना आणि बोटांना स्पर्श करून चिकित्सा केली जाते. रेकी उपचाराने वजन कमी करणे, हृदयरोग, कॅन्सर, झोप न येणे, थकवा, डोकेदुखी, त्वचा रोग, डिप्रेशन या समस्या दूर केल्यात जात असल्याचं बोललं जातं.

वजन कमी करण्यात कसा फायदेशीर ठरतो हा उपचार

रेकी अशी चिकित्सा पद्धती आहे, ज्याने मानसिक आणि शारीरिक रूपाने शरीर निरोगी होतं. रेकी टेक्निकद्वारे शरीरात ऊर्जा निर्माण केली जाते आणि ही ऊर्जाच शरीरातून आजार दूर करण्यासाठी काम करते. याने मेंदू तणावमुक्त होऊन भावनांना मजबूत करतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि वजन कमी करण्यासाठीच नाही तर कीमोथेरपीचे साइड इफेक्ट दूर करण्यासाठीही ही पद्धत फायदेशीर ठरते. वजन वाढल्याने नकारात्मकता आणि तणावही वाढतो. तणाव वाढला की, गोड किंवा फास्ड फूड खाण्याची इच्छा अधिक होते. पण रेकी या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

कसा केला जातो उपचार?

संतुलन - जेव्हा लोक रेकी उपचारातून जातात तेव्हा ते नेहमीच शारीरिक आणि भावनात्मक रूपाने अधिक संतुलित राहतात. याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याने त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळते.

(Image Credit : vermontvisitingnurses.org)

तणाव होतो कमी - रेकीच्या प्राथमिक उपायोगांपैकी एक म्हणजे याने तणाव कमी केला जातो. तणावाचं प्रमाण अधिक असलं की, शरीरात एड्रेनालाइन, कोर्टिसोल आणि कॉर्टिखोट्रॉफिन हार्मोन रिलीज होऊ लागतात. जे रेकीमुळे नष्ट होतात. तणावामुळे वजन वाढतं. यामुळे अनेकांना वजन कमी करण्यात अडचणी येतात. पण रेकीमुळे ही समस्या दूर होते. 

झोपेची पद्धत सुधारते - ज्या लोकांनी चांगली झोप येत नाही, त्यांच्यासाठी रेकी उपचार फार फायदेशीर ठरतो. वजन वाढण्याचं एक मोठं कारण चांगली झोप न येणं आणि पुरेशी झोप न होणं. रेकीमुळे तणाव कमी होतो आणि शरीर रिलॅक्स होतं. याने लोकांना चांगली झोप येते. तसेच याने हार्मोनल संतुलनासोबत भूकही नियंत्रित राहते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स