शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

रेकीमुळे खरंच वजन कमी करता येतं का? जाणून घ्या याचे फायदे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 11:11 IST

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का?

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का? असा प्रश्न विचारला जात आहे. रेकी ही एक जपानी नैसर्गिक चिकित्सा आहे. यात विधीमध्ये जीवन शक्ती आणि प्राण शक्तीच्या माध्यमातून उपचार केले जातात. म्हणजे व्यक्तीमध्ये एक आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करण्याची ही पद्धत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपचाराने एक नाही तर वेगवेगळे आजार बरे केले जातात असा दावा केला जातो. 

(Image Credit : medicalnewstoday.com)

या उपचार पद्धतीत व्यक्तीमधील शक्तीचाच त्याच्या समस्येच्या उपचारासाठी वापर केला जातो. रेकी उपचारात तळहातांना आणि बोटांना स्पर्श करून चिकित्सा केली जाते. रेकी उपचाराने वजन कमी करणे, हृदयरोग, कॅन्सर, झोप न येणे, थकवा, डोकेदुखी, त्वचा रोग, डिप्रेशन या समस्या दूर केल्यात जात असल्याचं बोललं जातं.

वजन कमी करण्यात कसा फायदेशीर ठरतो हा उपचार

रेकी अशी चिकित्सा पद्धती आहे, ज्याने मानसिक आणि शारीरिक रूपाने शरीर निरोगी होतं. रेकी टेक्निकद्वारे शरीरात ऊर्जा निर्माण केली जाते आणि ही ऊर्जाच शरीरातून आजार दूर करण्यासाठी काम करते. याने मेंदू तणावमुक्त होऊन भावनांना मजबूत करतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि वजन कमी करण्यासाठीच नाही तर कीमोथेरपीचे साइड इफेक्ट दूर करण्यासाठीही ही पद्धत फायदेशीर ठरते. वजन वाढल्याने नकारात्मकता आणि तणावही वाढतो. तणाव वाढला की, गोड किंवा फास्ड फूड खाण्याची इच्छा अधिक होते. पण रेकी या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

कसा केला जातो उपचार?

संतुलन - जेव्हा लोक रेकी उपचारातून जातात तेव्हा ते नेहमीच शारीरिक आणि भावनात्मक रूपाने अधिक संतुलित राहतात. याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याने त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळते.

(Image Credit : vermontvisitingnurses.org)

तणाव होतो कमी - रेकीच्या प्राथमिक उपायोगांपैकी एक म्हणजे याने तणाव कमी केला जातो. तणावाचं प्रमाण अधिक असलं की, शरीरात एड्रेनालाइन, कोर्टिसोल आणि कॉर्टिखोट्रॉफिन हार्मोन रिलीज होऊ लागतात. जे रेकीमुळे नष्ट होतात. तणावामुळे वजन वाढतं. यामुळे अनेकांना वजन कमी करण्यात अडचणी येतात. पण रेकीमुळे ही समस्या दूर होते. 

झोपेची पद्धत सुधारते - ज्या लोकांनी चांगली झोप येत नाही, त्यांच्यासाठी रेकी उपचार फार फायदेशीर ठरतो. वजन वाढण्याचं एक मोठं कारण चांगली झोप न येणं आणि पुरेशी झोप न होणं. रेकीमुळे तणाव कमी होतो आणि शरीर रिलॅक्स होतं. याने लोकांना चांगली झोप येते. तसेच याने हार्मोनल संतुलनासोबत भूकही नियंत्रित राहते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स