शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रेकीमुळे खरंच वजन कमी करता येतं का? जाणून घ्या याचे फायदे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 11:11 IST

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का?

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का? असा प्रश्न विचारला जात आहे. रेकी ही एक जपानी नैसर्गिक चिकित्सा आहे. यात विधीमध्ये जीवन शक्ती आणि प्राण शक्तीच्या माध्यमातून उपचार केले जातात. म्हणजे व्यक्तीमध्ये एक आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करण्याची ही पद्धत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपचाराने एक नाही तर वेगवेगळे आजार बरे केले जातात असा दावा केला जातो. 

(Image Credit : medicalnewstoday.com)

या उपचार पद्धतीत व्यक्तीमधील शक्तीचाच त्याच्या समस्येच्या उपचारासाठी वापर केला जातो. रेकी उपचारात तळहातांना आणि बोटांना स्पर्श करून चिकित्सा केली जाते. रेकी उपचाराने वजन कमी करणे, हृदयरोग, कॅन्सर, झोप न येणे, थकवा, डोकेदुखी, त्वचा रोग, डिप्रेशन या समस्या दूर केल्यात जात असल्याचं बोललं जातं.

वजन कमी करण्यात कसा फायदेशीर ठरतो हा उपचार

रेकी अशी चिकित्सा पद्धती आहे, ज्याने मानसिक आणि शारीरिक रूपाने शरीर निरोगी होतं. रेकी टेक्निकद्वारे शरीरात ऊर्जा निर्माण केली जाते आणि ही ऊर्जाच शरीरातून आजार दूर करण्यासाठी काम करते. याने मेंदू तणावमुक्त होऊन भावनांना मजबूत करतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि वजन कमी करण्यासाठीच नाही तर कीमोथेरपीचे साइड इफेक्ट दूर करण्यासाठीही ही पद्धत फायदेशीर ठरते. वजन वाढल्याने नकारात्मकता आणि तणावही वाढतो. तणाव वाढला की, गोड किंवा फास्ड फूड खाण्याची इच्छा अधिक होते. पण रेकी या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

कसा केला जातो उपचार?

संतुलन - जेव्हा लोक रेकी उपचारातून जातात तेव्हा ते नेहमीच शारीरिक आणि भावनात्मक रूपाने अधिक संतुलित राहतात. याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याने त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळते.

(Image Credit : vermontvisitingnurses.org)

तणाव होतो कमी - रेकीच्या प्राथमिक उपायोगांपैकी एक म्हणजे याने तणाव कमी केला जातो. तणावाचं प्रमाण अधिक असलं की, शरीरात एड्रेनालाइन, कोर्टिसोल आणि कॉर्टिखोट्रॉफिन हार्मोन रिलीज होऊ लागतात. जे रेकीमुळे नष्ट होतात. तणावामुळे वजन वाढतं. यामुळे अनेकांना वजन कमी करण्यात अडचणी येतात. पण रेकीमुळे ही समस्या दूर होते. 

झोपेची पद्धत सुधारते - ज्या लोकांनी चांगली झोप येत नाही, त्यांच्यासाठी रेकी उपचार फार फायदेशीर ठरतो. वजन वाढण्याचं एक मोठं कारण चांगली झोप न येणं आणि पुरेशी झोप न होणं. रेकीमुळे तणाव कमी होतो आणि शरीर रिलॅक्स होतं. याने लोकांना चांगली झोप येते. तसेच याने हार्मोनल संतुलनासोबत भूकही नियंत्रित राहते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स