शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

त्या बेवारस जनावरांचे खरे मालक कोण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोहमारा चौकात हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस विभागाचे मोठे कार्यालय आहे.

ठळक मुद्देमहामार्गावरील अपघातात वाढ : कोहमारा चौकात उड्डाणपुलाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या महामार्गावर मोकाट जनावरांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दोन दिवसांपूर्वीच या महामार्गावर सहा मोकाट जनावरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही जनावरे मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांचे पशुपालक पुढे आले नाही. त्यामुळे या मोकाट जनावरांचा मालक कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोहमारा चौकात हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस विभागाचे मोठे कार्यालय आहे. पण कोणताही अधिकारी वेळीच पोहचला नाही. अशोका कंपनीचे काही अधिकारी हे अकरा वाजता जेसीपी घेऊन दाखल झाले होते. हे काम आपले नसल्याचे कारण पुढे करून जबाबदारी झटकण्याचे काम होत असल्याचे चित्र येथे नेहमीच पाहावयास मिळत आहे.कोहमारा ग्राम प्रशासनाने याकडे थोेडे लक्ष देण्याची गरज आहे.पण मोकाट जनावरांना पकडून ठेवाचे कुठे हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा येऊन ठाकला आहे. पूर्वी कोंडवाडे गावात राहत होते. बेवारस जनावरांना पकडून त्यात ठेवले जात होते. मात्र आता ते नसल्याने पकडलेल्या जनावरांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. कोहमारा येथील चौकात नेहमीच मोकाट जनावरांचा वावर असतो. तर मागील काही दिवसांपासून या मार्गावर मोकाट जनावरे अपघात मृत्यूमुखी पडण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे याची दखल घेत यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर असलेल्या कोहमारा हे मुख्य ठिकाण आहे. या चौकात नवेगाव फाटा ते नैनपुर गावापर्यंत उड्डाण पुलाची नितांत गरज आहे. उड्डाणपूल तयार झाल्यास अपघात होणार नाही. यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर अपघात झाल्यास त्याची विल्हेवाट लवकर लावली जात नसल्याचे दिसत आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- वंदना थोटे, सरपंच कोहमारा

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात