शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कचारगडची वाट होणार सुकर

By admin | Updated: January 6, 2015 23:02 IST

आदिवासी समाजाचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या कचारगड येथील गुफेत जाण्यासाठी भाविकांना आणि पर्यटकांना आता होत असलेला त्रास कमी होणार आहे. या खडतर मार्गावर

सालेकसा : आदिवासी समाजाचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या कचारगड येथील गुफेत जाण्यासाठी भाविकांना आणि पर्यटकांना आता होत असलेला त्रास कमी होणार आहे. या खडतर मार्गावर आता पायऱ्यांच बांधकाम करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सोमवारी झाले.देशाच्या अनेक राज्यातून कचारगड येथे भाविक येतात. त्याचप्रमाणे कचारगड येथील गुफा ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून ती बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकसुध्दा उत्सुकतेपोटी येत असतात. त्या लोकांना येथे आल्यावर त्रास सहन करावा लागणार नाही. या हेतुने कचारगडला सर्व सोयी सुविधायुक्त करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. कचारगड येथे देवस्थान व गुफेकडे जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पायऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमगावचे आ.संजय पुराम,जिल्हाधिकारी अमित सैनी, मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी.शिंदे, जि.प. समाजकल्याण सभापती कुसन घासले, महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स. सालेकसाचे सभापती छाया बल्हारे, जि.प. सदस्या कल्याणी कटरे, कोसतर्रा येथील सरपंच पूजा वरकडे, एस.डी.ओ. सोनवाने, प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात संबोधित करताना आ.संजय पुराम म्हणाले की, वर्षानुवर्षे उपेक्षीत असलेला आदिवासी समाज विकास साधण्याकरीता शासनस्तरावर शर्तीचे प्रयत्न केले जातील. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांनी बिरसा मुंडा, माँ काली कंकाली यांच्या छायाचित्राला अभिवादन केला. आश्रमशाळा जमाकुडो येथील मुलींनी सुरेख गीतानी पाहुण्याचे स्वागत केले. दुपारी १ वाजता होणारा कार्यक्रम मंत्री महोदयाच्या दिवसभराच्या व्यस्ततेमुळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत येथे संपन्न झाला. तोपर्यंत सर्व स्थानिक पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी संयम ठेवून प्रतीक्षा करीत राहीले. नक्षलग्रस्त भाग असलेल्या मुळे सालेकसाचे ठाणेदार संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कचारगड समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी मांडले. कचारगडच्या विकासात सर्वानी हातभार लावण्याचे आवाहन केले. संचालन विजय बघेले यांनी केले तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी पी.एन.रघुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांच्या मार्गदर्शनात डी.बी.उईके, मिनाक्षी उनाडे, टी.के. मडावी, शिवलाल सयाम, संतोष पंधरे, कृष्णा जनबंधू, शंकर मडावी, टी.एस. तुरकर आदीनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)