शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या बारदान्याचे ७ कोटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर सन २०१९-२० धानाची विक्री करणाऱ्या पूर्व विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना ३६ ...

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर सन २०१९-२० धानाची विक्री करणाऱ्या पूर्व विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना ३६ लाख ५१ हजार बारदान्याचे ७ कोटी २१ लाख रुपये दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अद्यापही मिळालेले नाहीत. ही रक्कम परत मिळावी यासाठी शेतकरी मागील दोन वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळाच्या पायऱ्या झिजवीत आहेत.

पूर्व विदर्भात खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. सन २०१९-२० मध्ये पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांनी धान आणि ज्वारी आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर विक्री केली. या विभागाकडे बारदाना उपलब्ध नसल्याने त्याचा खरेदीवर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना प्रतिबारदाना २० रुपये देऊन धान खरेदी करण्यात आली. बारदान्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, ही रक्कम अद्यापही जमा केली नाही. बारदान्याच्या रकमेपाेटी आदिवासी विकास महामंडळाकडे एकूण ३६ लाख ५१ हजार १६८ बारदान्याचे ७ कोटी २१ लाख रुपये थकीत असल्याची बाब रोशन बडोले यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पुढे आली आहे. सर्वाधिक बारदान्याची रक्कम गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची असून, या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे ३ कोटी ६१ लाख रुपये थकले आहेत. चंद्रपूर १ कोटी ६७ लाख, नागपूर ४३ लाख आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १ कोटी ७७ लाख रुपये थकले आहेत. बारदान्याची रक्कम परत मिळावी यासाठी शेतकरी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. मात्र, अद्यापही रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यात आली नाही.

..............

न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकरी रोशन बडोले यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत या विभागाकडून माहिती मागितली. त्यानंतर या माहितीच्या आधारावर आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. सुरुवातीला या कार्यालयाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, बडोले यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर या विभागाने बारदान्याचे पैसे परत करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केल्याची माहिती आहे.