शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

अवकाळी पावसाचा पुन्हा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 6:00 AM

हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. तर आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.

ठळक मुद्देगोंदिया महसूल मंडळात अतिवृष्टी : १९.२ मि.मी.पावसाची नोंद, रबीतील हरभरा,गहू भूईसपाट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यातच बुधवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोंदिया तालुक्यात ६६ मि.मी.पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १९.२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे गहू आणि हरभरा पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. तर आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. तर ११ जानेवारीपर्यंत पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने या नुकसानीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस अधून मधून पडत असल्याने धान खरेदी केंद्रावर ठेवलेल्या धानाला अंकुर फुटले आहे. त्यामुळे या धानाची खरेदी करणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.यंदा जिल्ह्यात एकूण ३६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे.यात २६ हजार हेक्टरवर धान तर १० हजार हेक्टरवर गहू आणि हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.पावसामुळे हरभरा आणि गहू हे दोन्ही पीक पूर्णपणे भूईसपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पंचनामे करुन नुकसान भरपाईअवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका १० हजार हेक्टरमधील गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात या दोन्ही पिकांचे उत्पन्न मिळणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढणारजिल्ह्यात मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे रब्बी हंगामातील तूर आणि इतर पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस