शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीला निधीचा आधार

By admin | Updated: January 4, 2015 23:15 IST

पूर्व विदर्भातील राज्य सीमेवर असलेल्या आमगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य शासनाच्या विकास निधीचा लाभ उचलत शेतकरी व लहान व्यावसायिकांना अपेक्षित असलेल्या

यशवंत मानकर - आमगावपूर्व विदर्भातील राज्य सीमेवर असलेल्या आमगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य शासनाच्या विकास निधीचा लाभ उचलत शेतकरी व लहान व्यावसायिकांना अपेक्षित असलेल्या विकासाला चालना दिली आहे. बाजार समितीने चार कोटी ४७ लाखांच्या निधीचा राज्य शासनाकडून आधार घेत विकासाची वाटचाल प्रारंभ केली आहे.राज्याच्या सीमेवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढे केली. सन १९६१ मध्ये राज्य शासनाने या क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित भात व इतर पिकांना योग्य बाजार भाव मिळावे, यासाठी बाजार समितीची मागणी मंजूर केली.आमगाव तालुक्यात पूर्वी ५० गावांचा समावेश होता. परंतु कालांतराने तालुक्यातील पुर्नरचनेप्रमाणे ८३ गावांचा समावेश कार्यक्षेत्रात करण्यात आला. तालुक्यात शेतकरी साधारणत: भात पिकाची लागवड करतात. २२ हजार ३३६ हेक्टरमध्ये जमीन लागवडीखाली असून यात खरीप पीक २० हजार १५९ तर रबी पीक ४१० हेक्टरमध्ये घेण्यात येते. तसेच बागायती क्षेत्रात नऊ हजार १९३ व जिरायती २२ हजार ९१६ हेक्टर जमीन उपयोगी प्रमाणात वापरण्यात येते. शेतकऱ्यांना उत्पादित पिकांना योग्य बाजार भाव मिळवून देण्यासाठी बाजार समितीने खुल्या बाजार पेठेची उपयोगिता पुढे केली आहे. खासगी व्यावसायिकांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार समिती आधार देण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत.राज्य शासनाने घोषित केलेल्या एकूण १०६ पिकांना कृषी उपज वस्तू म्हणून मान्यता मिळाली आहे. या पिकांना योग्य दर निश्चित व्हावे, यासाठी स्थानिक परवानाधारक व्यावसायिकांच्या पुढाकाराने लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. शासनाने बाजार समितीच्या मार्फत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी योजनांचा आधार दिला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या पुढाकाराने शेतकरी मार्गदर्शनाकरिता, मोफत प्रवास व्यवस्था, तसेच प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना पीक काढण्यासाठी लागणारे कर्ज सुलभतेने मिळावे यासाठी बँक व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करण्याचे ध्येय साकारत व बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज सुलभतेने मिळावे यासाठी बाजार समितीमधून आर्थिक तरतूद केली आहे. यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री होईपर्यंत या योजनेचा लाभ सुलभतेने घेण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. बाजार समितीने आर्थिक तडजोडीतून पुढाकार घेतला. दिवंगत वसंतराव शिवणकर यांच्या यशस्वी प्रयत्नांना पुढे नेत बाजार समितीचा कायापालट करण्यात माजी आ. केशवराव मानकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. बाजार समितीने राज्य शासनाच्या राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत ४६ लाख रुपये निधी स्वत: गोळा करुन चार कोटी ४७ लाखाचा निधी शासनाकडून मंजूर करुन घेतला. या विकास निधी अंतर्गत शेतकरी व बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे पीक, वस्तु विक्रीकरिता आॅक्सन शेड, गोदाम, टुडर्स शॉप, कॅटल शेड, वाटर ट्रॅप, तपासणी नाका व संरक्षण आवारभिंत बांधकामाचे नियोजन झाले आहे.